शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

टंचाई परिस्थितीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST

परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. चिंतेत सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊही तालुक्यांचा समावेश असल्याचा आदेश १९ आॅगस्ट रोजी महसूल विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमीच आहे. असे असताना यावर्षी समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्याचे जून ते आॅक्टोबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७६४.५९ मि.मी. आहे. आजपर्यंत ४७०.४ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरीची टक्केवारी केवळ १७.१५ टक्के झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली असून चांगला पाऊस न झाल्यास ही पिके वाचविणे कठीण जाणार आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ९ तालुके येतात की नाही, या विषयी जिल्हावासियांना शंका वाटत होती. अखेर या संदर्भातील महसूल विभागाचा आदेश १९ आॅगस्ट रोजी निघाला. त्यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत या सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यांमधील बळीराजाला एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी)