शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

संगणक हाताळणाऱ्या विद्यार्थिनींच्या हाती खुरपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे.

ठळक मुद्देविद्यापीठातील प्रकार : कौशल्याधारित कामे देण्याची आमदार चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे. या विद्यार्थिनी कमवा आणि शिका योजनेत काम करतात. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थिनी गावाकडेही खुरपण्याचे काम करीत होत्या. विद्यापीठात आल्यानंतरही त्यांच्या हाती खुरपेच दिले जाणार असेल तर प्रगती कशी होणार? असा सवाल करून या विद्यार्थिनींना कौशल्याधारित कामे देण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आ. चव्हाण यांनी सोमवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता विद्यापीठातील उद्यानात कमवा व शिकाच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा या विद्यार्थिनी गवत खुरपत होत्या. यात संगणक, रसायनशास्त्र, तंत्रज्ञान आदी विभागातील विद्यार्थिनीही होत्या. कोणत्याही विभागातील विद्यार्थिनी असल्या तरी त्यांना कौशल्याधारित कामे देण्याऐवजी खुरपण्याचे काम देण्यात आले. या विद्यार्थिनींना काम केल्यानंतर सही करण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते. ९.१५ वाजेपर्यंत या विद्यार्थिनी तेथे असतात. यातील अनेक जणींना सोमवारी १० वाजता विभागात परीक्षा देण्यास जायचे होते. तरीही त्यांना लवकर सोडण्यात आले नाही, अशा प्रकारची अमानवी, अमानुष वागणूक आपण विद्यार्थिनींना देत आहोत, याचे भानही प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते. विद्यार्थिनींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मुली पाण्यासाठी बॉटल घेऊन सर्वत्र फिरतात. एक बाटली पाणी मिळत नाही. एकाही विद्यार्थिनींच्या वसतिगृहात खानावळीची सुविधा नाही. स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील दीड वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नाही. अनेक मुली आजारी पडलेल्या आहेत. त्यांना तपासण्यासाठी विद्यापीठात एकही महिला वैद्यकीय अधिकार नाही. याविषयीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.दिवाळीनंतर विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर हा प्रश्न आमच्या पद्धतीने सोडविण्यात येईल, असा इशाराही आ. चव्हाण यांनी दिला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य डॉ. स्मिता अवचार, डॉ. राम चव्हाण, प्रा.सुनील मगरे, डॉ. भारत खैरनार, शेख जहूर, विद्यापरिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्यासह डॉ. संभाजी वाघमारे, अमाले दांडगे, मयूर सोनवणे, अक्षय पाटील, दीक्षा पवार आदी उपस्थित होते.प्राध्यापकांना बंदी अन् कुलगुरू दौºयावरविद्यापीठातील प्राध्यापक, अधिकाºयांना सुटी घेण्याची, दौºयावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कुलगुरू प्रभारी अधिकाºयांना घेऊन परदेश दौºयावर कसे जातात? असा सवालही आ.चव्हाण यांनी उपस्थित केला. विद्यापीठात अनेक सेवानिवृत्तांना हजारो रुपये पगार देऊन सल्लागार म्हणून नेमले. हे लोक काय सल्ला देतात. त्यांच्यावर फसवणूक करून पगार उचलतात याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ