शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

औरंगाबादेत वाहने ‘स्क्रॅप’ करण्याचा उद्योग घेतोय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार आहेत. त्यासाठी काही नवउद्योजकांनी एकत्र येऊन ‘स्कार्प यार्ड इंडिया’ नावाने जुनी वाहने नष्ट करण्याचा ‘स्टार्टअप’ उद्योग सुरु करण्याची तयारी केली आहे. जवळपास ८ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा उद्योग येत्या सहा महिन्यांत औरंगाबादेत कार्यान्वीत होईल.

यासंदर्भात औरंगाबादेतील तरुण उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले की, काही वर्षांपासून मी रिसायकलिंग उद्योगात आहे. त्याचा फायदा आता शासनाने जाहीर केलेल्या ‘स्क्रॅपेज’ धोरणासाठी होईल. ‘स्टिकलर एन्व्हायर्सल’ या नावाची आमची कंपनी आहे. या कंपनीत वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी स्वॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही प्रकारच्या सेवा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आमचे २४ सहकारी काम करीत आहेत. आता आम्ही स्वत:च आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा स्टार्टअप उद्योग येत्या सहा महिन्यांत सुरु करत आहोत.

जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण खासगी वाहनांसाठी १ एप्रिल २०२१ पासून अंमलात आणण्याची शासनाची तयारी आहे, त्यानुसार खासगी मालकिची २० वर्षे जुनी वाहने, तर १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहने भंगारात काढावी (नष्ट करावी) लागतील. त्यासाठी सध्या तरी मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण राज्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा उद्योग अस्तित्वात नाही. या उद्योगासाठी स्क्रॅपिंग मशीन खरेदी, याबाबतचे स्वॉफ्टवेअर, वाहनाचे प्लास्टीक, रबर, फायबर, काच, लोखंड, तांबे, ॲल्युमिनीयम, विविध प्रकारचे ऑईल, गॅस वेगळे करुन त्यांची रिसायकलींग कशी करायची, असा संपूर्ण सेटअप तयार करून देण्याचे काम आम्ही ‘स्क्रॅप यार्ड इंडिया’ मार्फत करत आहोत. आतापर्यंत देशभरातील २०० उद्योजकांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचे गट्टाणी यांनी सांगितले.

चौकट.......

वाहनधारकाकडे ‘डिस्ट्रक्शन’ प्रमाणपत्र हवे

जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर त्या वाहनाच्या चेसीस नंबरचा नंतर दुरुपयोग होऊ नये. याची खबरदारी वाहनमालकाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शासनमान्य उद्योगांकडेच आपली जुनी वाहने नष्ट करण्यासाठी देणे गरजेचे आहे. त्यानंतर वाहनमालकाने

आपले वाहन संपूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे (डिस्ट्रक्शन) प्रमाणपत्र सादर केल्यास त्याला नवीन वाहन खरेदी करताना किंवा

नवीनवाहनांचे रजिस्ट्रेशन करताना सूट देण्याचा शासनाचा विचार आहे, असे उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले.