शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

औरंगाबादेत वाहने ‘स्क्रॅप’ करण्याचा उद्योग घेतोय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार आहेत. त्यासाठी काही नवउद्योजकांनी एकत्र येऊन ‘स्कार्प यार्ड इंडिया’ नावाने जुनी वाहने नष्ट करण्याचा ‘स्टार्टअप’ उद्योग सुरु करण्याची तयारी केली आहे. जवळपास ८ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा उद्योग येत्या सहा महिन्यांत औरंगाबादेत कार्यान्वीत होईल.

यासंदर्भात औरंगाबादेतील तरुण उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले की, काही वर्षांपासून मी रिसायकलिंग उद्योगात आहे. त्याचा फायदा आता शासनाने जाहीर केलेल्या ‘स्क्रॅपेज’ धोरणासाठी होईल. ‘स्टिकलर एन्व्हायर्सल’ या नावाची आमची कंपनी आहे. या कंपनीत वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी स्वॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही प्रकारच्या सेवा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आमचे २४ सहकारी काम करीत आहेत. आता आम्ही स्वत:च आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा स्टार्टअप उद्योग येत्या सहा महिन्यांत सुरु करत आहोत.

जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण खासगी वाहनांसाठी १ एप्रिल २०२१ पासून अंमलात आणण्याची शासनाची तयारी आहे, त्यानुसार खासगी मालकिची २० वर्षे जुनी वाहने, तर १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहने भंगारात काढावी (नष्ट करावी) लागतील. त्यासाठी सध्या तरी मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण राज्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा उद्योग अस्तित्वात नाही. या उद्योगासाठी स्क्रॅपिंग मशीन खरेदी, याबाबतचे स्वॉफ्टवेअर, वाहनाचे प्लास्टीक, रबर, फायबर, काच, लोखंड, तांबे, ॲल्युमिनीयम, विविध प्रकारचे ऑईल, गॅस वेगळे करुन त्यांची रिसायकलींग कशी करायची, असा संपूर्ण सेटअप तयार करून देण्याचे काम आम्ही ‘स्क्रॅप यार्ड इंडिया’ मार्फत करत आहोत. आतापर्यंत देशभरातील २०० उद्योजकांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचे गट्टाणी यांनी सांगितले.

चौकट.......

वाहनधारकाकडे ‘डिस्ट्रक्शन’ प्रमाणपत्र हवे

जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर त्या वाहनाच्या चेसीस नंबरचा नंतर दुरुपयोग होऊ नये. याची खबरदारी वाहनमालकाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शासनमान्य उद्योगांकडेच आपली जुनी वाहने नष्ट करण्यासाठी देणे गरजेचे आहे. त्यानंतर वाहनमालकाने

आपले वाहन संपूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे (डिस्ट्रक्शन) प्रमाणपत्र सादर केल्यास त्याला नवीन वाहन खरेदी करताना किंवा

नवीनवाहनांचे रजिस्ट्रेशन करताना सूट देण्याचा शासनाचा विचार आहे, असे उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले.