शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

औरंगाबादेत वाहने ‘स्क्रॅप’ करण्याचा उद्योग घेतोय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘स्कार्पेज’ धोरण स्वीकारले असून यापुढे आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढावी लागणार आहेत. त्यासाठी काही नवउद्योजकांनी एकत्र येऊन ‘स्कार्प यार्ड इंडिया’ नावाने जुनी वाहने नष्ट करण्याचा ‘स्टार्टअप’ उद्योग सुरु करण्याची तयारी केली आहे. जवळपास ८ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा उद्योग येत्या सहा महिन्यांत औरंगाबादेत कार्यान्वीत होईल.

यासंदर्भात औरंगाबादेतील तरुण उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले की, काही वर्षांपासून मी रिसायकलिंग उद्योगात आहे. त्याचा फायदा आता शासनाने जाहीर केलेल्या ‘स्क्रॅपेज’ धोरणासाठी होईल. ‘स्टिकलर एन्व्हायर्सल’ या नावाची आमची कंपनी आहे. या कंपनीत वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी स्वॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही प्रकारच्या सेवा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आमचे २४ सहकारी काम करीत आहेत. आता आम्ही स्वत:च आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा स्टार्टअप उद्योग येत्या सहा महिन्यांत सुरु करत आहोत.

जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण खासगी वाहनांसाठी १ एप्रिल २०२१ पासून अंमलात आणण्याची शासनाची तयारी आहे, त्यानुसार खासगी मालकिची २० वर्षे जुनी वाहने, तर १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहने भंगारात काढावी (नष्ट करावी) लागतील. त्यासाठी सध्या तरी मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण राज्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने नष्ट करण्याचा उद्योग अस्तित्वात नाही. या उद्योगासाठी स्क्रॅपिंग मशीन खरेदी, याबाबतचे स्वॉफ्टवेअर, वाहनाचे प्लास्टीक, रबर, फायबर, काच, लोखंड, तांबे, ॲल्युमिनीयम, विविध प्रकारचे ऑईल, गॅस वेगळे करुन त्यांची रिसायकलींग कशी करायची, असा संपूर्ण सेटअप तयार करून देण्याचे काम आम्ही ‘स्क्रॅप यार्ड इंडिया’ मार्फत करत आहोत. आतापर्यंत देशभरातील २०० उद्योजकांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचे गट्टाणी यांनी सांगितले.

चौकट.......

वाहनधारकाकडे ‘डिस्ट्रक्शन’ प्रमाणपत्र हवे

जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर त्या वाहनाच्या चेसीस नंबरचा नंतर दुरुपयोग होऊ नये. याची खबरदारी वाहनमालकाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शासनमान्य उद्योगांकडेच आपली जुनी वाहने नष्ट करण्यासाठी देणे गरजेचे आहे. त्यानंतर वाहनमालकाने

आपले वाहन संपूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे (डिस्ट्रक्शन) प्रमाणपत्र सादर केल्यास त्याला नवीन वाहन खरेदी करताना किंवा

नवीनवाहनांचे रजिस्ट्रेशन करताना सूट देण्याचा शासनाचा विचार आहे, असे उद्योजक रामेश्वर गट्टाणी यांनी सांगितले.