शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा आजपासून गजबजणार !

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण खात्याने केली आहे.

उस्मानाबाद : दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण खात्याने केली आहे. रविवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी या तयारीचा आढावा घेवून शाळा भेटीचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटपही केले जाणार आहेत. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामध्ये कुठल्याही स्वरुपाची कसूर राहु नये, यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक मागील आठवडाभरापासून तयारीला लागले होते. वादळी वाऱ्यामुळे १९ शाळांवरील पत्रे उडून गेले होते. यामध्ये ५ शाळांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उर्वरित शाळांवर पत्रे टाकण्यात आले असून, काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असल्यामुळे शाळा परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. अशा शाळांची साफसफाई करुन घेण्यात आली असून, परिसर चक्काचक केला आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बैठका घेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून लागलीच उपाययोजना करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी सांगितले.पुस्तक वितरणाचे कामही मागील काही दिवसापासून सुरु होते. हे कामही दोन दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले असून, प्रत्येक शाळावर पुस्तके पोहंच करण्यात आली आहेत. तसेच गणवेशासाठीची तरतूद उपलब्ध न झाल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सर्व शिक्षा अभियानच्या अखर्चित रक्कम गणवेशासाठी वापरण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ज्या शाळांनी तयारी केली आहे, त्या शाळांवर पहिल्या दिवशीच गणवेश देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, शिक्षण विभागाने यंदा फुलांऐवजी विद्यार्थ्यांना रोपटे देऊन स्वागत करण्याचे निश्चित केले होते. मात्र वरुणराजाने दडी मारल्याने याऐवजी आता विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करण्याचे निश्चित झाले आहे.२५६४ नवागतांचा प्रवेश अपेक्षितजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार किमान २५ हजार ६४ विद्यार्थ्यांना प्रवेश देणे गृहीत धरले आहे. प्रत्यक्ष कितीजण शाळेत दाखल होतात हे सोमवारी समोर येणार असले तरी शिक्षण विभागाने हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी केल्याचे सांगण्यात आले.अध्यक्ष, उपाध्यक्ष देणार भेटीकर्मचाऱ्यांसोबतच जिल्हास्तरावरून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत हेही विविध शाळांना भेटी देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. (प्रतिनिधी)पथके देणार शाळांना भेटीसुचित केल्यानुसार शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे की नाही, हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाने पथके स्थापन केली आहेत. ही पथके एकूण १३ बाबी तपासणार आहेत. यामध्ये नियोजन, शिक्षक उपस्थिती, वार्षिक नियोजन, टाचण काढणे, वर्ग सजावट, फळ्यांची रंगरंगोटी, पुस्तक वाटप, स्वच्छतागृह, किचनशेड, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, मुख्याध्यापक कक्ष अद्ययावत आहे का? प्रयोगशाळा, संगणककक्ष, ग्रंथालय सुस्थितीत आहे का, पोषण आहार, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट व पक्ष प्रवेश आणि इयत्तानिहाय पट व उपस्थितीची पाहणी केली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.४३६ नवीन वर्गशिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) चौथीच्या वर्गाल पाचवीचा तर सातवीच्या वर्गाला आठवीचा वर्ग जोडण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा नव्याने ४३६ वर्ग वाढले आहेत. यामध्ये पाचवीचे २५८ तर आठवीचे १७८ वर्ग आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीच्या शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे. कारवाईचा बडगाशाळावरील मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाने पथके गठित केली होती. त्यानुसार सर्वसंबंधित अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देवून लागलीच त्रुटींची पूर्तता करुन घेतली. मात्र २४ गुरुजींनी सूचना पाळल्या नाहीत. शाळेवर उपस्थित राहण्याचे सांगूनही त्याकडे कानाडोळा केला. परिणामी त्यांच्यावर कारवार्ईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधितांना नोटिसा दिल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.मुख्याध्यापक, शिक्षकांना सूचना देऊन नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी झाली असून पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतील.- औदुंबर उकिरडे,शिक्षण अधिकारी