शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

जि.प.मध्ये शिक्षकांच्या समायोजनात ‘शाळा’ !

By admin | Updated: July 5, 2014 00:37 IST

बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. एकाच जागेवर दोन- दोन शिक्षकांना रूजू आदेश गेल्यामुळे समुपदेशनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली असून रूजू कोणाला करून घ्यायचे याचा पेच निर्माण झाला आहे.बारावी डी.एड. या शैक्षणिक अर्हतेवर सहशिक्षक म्हणून नियुक्त्या मिळालेल्या अनेक शिक्षकांनी पदवी प्राप्त केली. प्राथमिक पदवीधर ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे पदवी प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक पदवीधर या पदावर दर्जावाढ देण्यात आली. जवळपास एक हजार शिक्षकांना दर्जावाढ बहाल केल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तालुकानिहाय समायोजन जि.प.च्या सभागृहात पार पडले. जिल्ह्यात अतिरिक्त असलेल्या १३४ शिक्षकांना समायोजनात प्राधान्य देण्यात आले. मात्र समायोजना दरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. समायोजन समुपदेशनानुसार व पारदर्शक पद्धतीने सुरु असल्याचे चित्र निर्माण केले खरे परंतु एका जागेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र नियुक्ती आदेश गेल्याने समुपदेशन कसे झाले हे स्पष्ट होत आहे.धारूर तालुक्यातील आसरडोह येथे मच्छिंद्र पंडित सोळंके हे शिक्षक जावक क्र. ५१४९ या आदेशाने रूजू होण्यासाठी गेले. तर त्यांच्या आधीच त्याच जागेवर अनिल पांडुरंग सारडा हे जावक क्र.५८४१ नुसार रूजूही झाले. एकाच जागेसाठी दोन रूजू अर्ज गेल्याचे हे प्राथमिक उदाहरण आहे. मात्र बीड, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा या तालुक्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड तालुक्यातील पाली येथे देखील एका शिक्षिकेसह शिक्षकाला स्वतंत्र रूजू आदेश आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम दरम्यान, समायोजनात झालेल्या या गोंधळामुळे अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण जिल्ह्यात पूर्वीचेच १३४ अतिरिक्त शिक्षक आहेत. या शिवाय आंतरजिल्हा बदलीने दीडशेहून अधिक शिक्षक जिल्ह्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न काय राहील, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)दुरूस्ती करू- जवळेकरयाबाबत सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, एकाच जागेसाठी दोन अर्ज कसे गेले याची माहिती घेतली जाईल. तसे असेल तर दुरूस्ती करण्यात येईल. मात्र दर्जावाढ, समायोजनामुळे रिक्त जागा भरल्या असून अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. तालुक्याबाहेरील शिक्षकांना थारा नाही- क्षीरसागरसभापती संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की, काही आदेश परस्पर निघाले असावेत. तालुक्याबाहेरील शिक्षकांना मुख्याध्यापकांनी रूजू करून घेऊ नये. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशांनाच अधिकृत समजावे. परस्पर आदेश काढल्याचे निदर्शनास आले तर गय नाही, असा इशारा त्यांनी दिला.