शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली

By admin | Updated: May 13, 2016 00:07 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदापासून आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राहील.

औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदापासून आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राहील. विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे नापास अथवा पास असे वर्गीकरण न करता शिष्यवृत्तीसाठी पात्र अथवा अपात्र असे नमूद केले जाणार आहे. २०१६-१७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचे धोरण शासनाने निश्चित केल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात (२०१५-१६) ही परीक्षा घेतली नव्हती. आतापर्यंत परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते होती.नवीन शैक्षणिक वर्षापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे.या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांना नापास अथवा यशस्वी झालेल्यांचा पास, असा उल्लेख करण्यात येत होता. यापुढे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून शिष्यवृत्तीस पात्र अथवा अपात्र असा उल्लेख करून तशी नोंद गुणपत्रिकेतही केली जाणार आहे. याशिवाय परीक्षा पद्धतीतदेखील यंदापासून बदल करण्यात आले आहेत.