शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

टंचाई निवारण कामांचा खोळंबा !

By admin | Updated: April 10, 2017 23:59 IST

बीडजिल्ह्यात यंदा सरासरी एवढा पाऊस होऊनही अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न बिकट बनत आहे.

संजय तिपाले  बीडजिल्ह्यात यंदा सरासरी एवढा पाऊस होऊनही अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. टंचाई निवारणार्थ २२ कोटींच्या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरीही दिली; परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप अंदाजपत्रकेच सादर केली नाहीत. परिणामी टंचाई काळात करावयाची कामे खोळंबून पडली आहेत.टंचाई निवारणासाठी आॅक्टोबर ते जून असा नऊ महिन्यांचा कृती आराखडा जि.प. तर्फे तयार करण्यात आला होता. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात कोठेही पाण्याची टंचाई नव्हती. त्यामुळे जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा सहा महिन्यांच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजनांसाठी २१ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद केली होती. दरम्यान, एप्रिल महिन्यातील १० दिवस उलटले तरीही जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक व गेले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय मान्यता रखडल्या आहेत. परिणामी टंचाई निवारणार्थ विहीर, बोअर, विंधनविहीर, जलपुनर्भरण आदी कामे खोळंबली आहेत. टंचाई आराखड्यात तब्बल २१९६ कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांत सध्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा संपायला अडीच महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप कामांचे अंदाजपत्रकेच तयार नसल्याने प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता कधी भेटणार? व कामे कधी सुरु होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सध्या दोनशेवर गावांतून टँकरमागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.