कनगरा : उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील पशुवैद्यकीय केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, पशुपालक, शेतकऱ्यांना खासगी औषधी दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत़ त्यातच अपुऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे कनगरा येथे वर्ग दोनचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे़ या पशुवैद्यकीय रूग्णालयात कनगऱ्यासह परिसरातील गावातून पशुपालक, शेतकरी आपापली जनावरे औषधोपचारासाठी घेवून येतात़ या रूग्णालयात सकाळी ८ ते दुपारी एक व दुपारी ३ ते ५ या वेळेत सेवा मिळत असल्याने अनेक पशुपालक आपापली आजारी पडलेली जनावरे घेवून कनगरा येथील पशुवैद्यकीय केंद्रात येतात़ मात्र, अनेकवेळा येथे केवळ पाहणी करून औषधे मात्र, बाहेरून आणण्यासाठी सांगितले जाते़ ही औषधे खरेदी करण्यासाठी पशुपालकांना बेंबळी, उजनी किंवा थेट जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरात जावे लागत आहे़ याशिवाय अधिकारी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले तर पशुपालकांना त्यांची वाट पाहत थांबावे लागते किंवा दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी पशुंना घेवून परत केंद्रात यावे लागत आहे़ अपुरे अधिकारी, कर्मचारी आणि औषधांच्या तुटवड्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे़तरी वरिष्ठांनी या पशुवैद्यकीय रूग्णालयात औषधांचा मुबलक पुरवठा करावा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी कनगरासह परिसरातील पशुपालक, शेतकऱ्यांमधून होत आहे़
पशुवैद्यकीय केंद्रात औषधांचा तुटवडा
By admin | Updated: November 30, 2015 23:30 IST