शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

‘श्री’ ला आज निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:35 IST

विघ्नहर्त्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार असून या निरोपाची भाविकांनी तसेच प्रशासनानेही तयारी केली आहे. १२ दिवसांच्या पूजाअर्चेनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी आर्त हाक देत गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विघ्नहर्त्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार असून या निरोपाची भाविकांनी तसेच प्रशासनानेही तयारी केली आहे. १२ दिवसांच्या पूजाअर्चेनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी आर्त हाक देत गणरायाला निरोप दिला जाणार आहे.गणेश चतुर्थीला गणरायाची वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले होते. यंदा गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा होता. या कालावधीत गणेश मंडळांच्या वतीने तसेच घरगुती गणेशाच्या स्थापनेनंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात आले. जिल्ह्यात यंदा जवळपास ३ हजार ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली होती. त्यात नांदेड शहरातही जवळपास साडेचारशे सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’ ची स्थापना केली होेती.गणेशोत्सव काळात संपूर्ण वातावरण आनंदाचे, उत्साहाचे होते. याच कालावधीत मुस्लिम बांधवांची बकरी ईदही आली होेती. हा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासनापुढे या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान होते. योग्य नियोजनातून ते आव्हान पेलण्यातही आले.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘श्री’ स्थापनेच्या पूर्वसंध्येला शांतता बैठक घेऊन संपूर्ण नियोजन केले होते. यात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचेही गणेशोत्सव कालावधीत काटेकोरपणे पालन झाले. परिणामी संपूर्ण उत्साहात गणेशोत्सव आणि बकरी ईदही पार पडली. मंगळवारी ‘श्रीं’ चे विसर्जन होणार आहे. हे विसर्जनही शांततेत व आनंदाच्या वातावरणात पार पडावे, यासाठी तयारी करण्यात आली आहे.विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डोंगरे, पोलीस अधीक्षक मीना, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटांना भेटी दिल्या. या मार्गावरील बंदोबस्ताची पाहणी केली.