शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सव्वादोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 7, 2015 01:25 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत विभागात तब्बल २२६ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी पावसामुळे मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. यंदाच्या वर्षी खरिपाचे संपूर्ण पीक पाण्याअभावी हातचे निघून गेले. शिवाय रबीची पेरणीही होऊ शकली. दोन्ही पिकांचे उत्पन्न बुडाले, आता पुढील वर्ष कसे काढायचे ही विंवचना असतानाच अनेकांना त्यांच्याकडील कर्जाच्या वसुलीसाठी सावकार आणि बँकांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्वाला कंटाळून अनेक जण आत्महत्या करीत आहेत. विभागात १ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत २२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात ३८, जालना जिल्ह्यात १२, परभणी जिल्ह्यात १२, हिंगोली जिल्ह्यात ०, नांदेड जिल्ह्यात ३६, बीड जिल्ह्यात ६४, लातूर जिल्ह्यात २० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३५५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागात आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांपैकी १०८ प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. २८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर ९० प्रकरणांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे.