शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 7, 2015 01:25 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत विभागात तब्बल २२६ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी पावसामुळे मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. यंदाच्या वर्षी खरिपाचे संपूर्ण पीक पाण्याअभावी हातचे निघून गेले. शिवाय रबीची पेरणीही होऊ शकली. दोन्ही पिकांचे उत्पन्न बुडाले, आता पुढील वर्ष कसे काढायचे ही विंवचना असतानाच अनेकांना त्यांच्याकडील कर्जाच्या वसुलीसाठी सावकार आणि बँकांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्वाला कंटाळून अनेक जण आत्महत्या करीत आहेत. विभागात १ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत २२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात ३८, जालना जिल्ह्यात १२, परभणी जिल्ह्यात १२, हिंगोली जिल्ह्यात ०, नांदेड जिल्ह्यात ३६, बीड जिल्ह्यात ६४, लातूर जिल्ह्यात २० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३५५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागात आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांपैकी १०८ प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. २८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर ९० प्रकरणांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे.