शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बाजी!

By admin | Updated: May 30, 2017 22:59 IST

बीड : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा आपणच भारी असल्याचे सावित्रीच्या लेकींनी दाखवून देत बाजी मारली. जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला. औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या स्थानावर आहे. निकाल जाहीर होताच मुला- मुलींनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यात ३० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात मुले आणि मुली मिळून ३७ हजार २७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. पैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात जिल्ह्यातून २३ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. पैकी २३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २१ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १३ हजार ५३३ विद्यार्थिनींनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी १३ हजार ४७१ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १२ हजार ४०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचे प्रमाण ८९.५७ एवढे आहे, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१० एवढे असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल ९०.४९ एवढा लागला. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी या तालुक्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर पाटोदा, केज, शिरूर आणि वडवणी तालुक्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकालबीड जिल्ह्यात विज्ञान, कला व वाणिज्य शाखा व एमसीव्हीसी मिळून ३७ हजार १५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६, कला शाखेचा ८३.९१ आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९२.१७ आणि एमसीव्हीसीचा ८४.८२ टक्के लागला.विज्ञान शाखेमध्ये १८ हजार ४४२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३४६ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, १० हजार ८८४ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, ५४२५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली. कला शाखेत १४ हजार ८९३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी ८३१ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, ७ हजार ९१५ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ३ हजार ६५५ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली. वाणिज्य शाखेत २ हजार ८८६ परीक्षार्थींनी परीक्षा देत ३२६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ११२१ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ६४६ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी मिळविली. एमसीव्हीमध्ये १५३५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी विशेष प्राविण्य ७५, प्रथम श्रेणी ८७४ व ३५३ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली.