शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बाजी!

By admin | Updated: May 30, 2017 22:59 IST

बीड : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा आपणच भारी असल्याचे सावित्रीच्या लेकींनी दाखवून देत बाजी मारली. जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला. औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या स्थानावर आहे. निकाल जाहीर होताच मुला- मुलींनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यात ३० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात मुले आणि मुली मिळून ३७ हजार २७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. पैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात जिल्ह्यातून २३ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. पैकी २३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २१ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १३ हजार ५३३ विद्यार्थिनींनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी १३ हजार ४७१ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १२ हजार ४०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचे प्रमाण ८९.५७ एवढे आहे, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१० एवढे असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल ९०.४९ एवढा लागला. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी या तालुक्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर पाटोदा, केज, शिरूर आणि वडवणी तालुक्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकालबीड जिल्ह्यात विज्ञान, कला व वाणिज्य शाखा व एमसीव्हीसी मिळून ३७ हजार १५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६, कला शाखेचा ८३.९१ आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९२.१७ आणि एमसीव्हीसीचा ८४.८२ टक्के लागला.विज्ञान शाखेमध्ये १८ हजार ४४२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३४६ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, १० हजार ८८४ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, ५४२५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली. कला शाखेत १४ हजार ८९३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी ८३१ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, ७ हजार ९१५ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ३ हजार ६५५ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली. वाणिज्य शाखेत २ हजार ८८६ परीक्षार्थींनी परीक्षा देत ३२६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ११२१ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ६४६ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी मिळविली. एमसीव्हीमध्ये १५३५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी विशेष प्राविण्य ७५, प्रथम श्रेणी ८७४ व ३५३ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली.