शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ ऑक्टोबरला होणाऱ्या अधिपरिचारिका भरती परीक्षेचे निकाल राखून ठेवा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 11:44 IST

Aurangabad High Court : नोटीस काढूनही संचालनालयाच्यावतीने न्यायाधिकरणापुढे ठोस शपथपत्र दाखल करण्यात आले नाही

ठळक मुद्देआरोग्य सेवा संचालनालयाला प्रशासकीय न्यायाधिकरणाचा दणका

औरंगाबाद : येत्या २४ ऑक्टोबर २०२१ रोजी होऊ घातलेल्या नियोजीत अधिपरिचारिका भरती परीक्षेचा ( Staff Nurse Recruitment Examination ) निकाल राखून ठेवण्याचे अंतरिम निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ( Aurangabad High Court) न्या. व्ही. डी. डोंगरे व प्रशासकीय सदस्य बिजयकुमार यांच्या पीठाने दिले आहेत.

लातूर येथील नितीन होळंबे व सहकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेत सदर आदेश देण्यात आले. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोग्य सेवा संचालनालयाने अधिपरिचारीका पदासाठीचे भरती नियम जारी केले. या अनुषंगाने पद भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. जाहिरातीत नमूद एकूण पदसंख्येपैकी ५० टक्के पदे ही खाजगी परिचर्या संस्थांमधून पदवी, पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी तर उर्वरीत ५० टक्के पदे ही शासकीय संस्थांमधून परिचारिका अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली. शिवाय, ९० टक्के पदे ही महिला उमेदवारांसाठी राखीव दाखवण्यात आली.

आरक्षणासाठी आधारभूत मानलेले भरतीनियम हे अन्यायकारक व संविधानातील समानतेच्या सूत्राचा भंग करणारे आहेत, राज्यभरातील परिचारिका प्रशिक्षण देणार्‍या खाजगी तथा शासकीय संस्था आणि त्यातून बाहेर पडणारे प्रशिक्षित उमेदवार यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. मुळात महिलांना ३० टक्के आरक्षणाचा लाभ दिलेला असताना ९० टक्के जागांवर महिलांना नियुक्ती देणे हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आरक्षण मर्यादेचा भंग करणारे आहे, असे मुद्दे उपस्थित करून नितीन होळंबे व सहकार्‍यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याचिकेद्वारे दाद मागितली आहे.

नोटीस काढूनही संचालनालयाच्यावतीने न्यायाधिकरणापुढे ठोस शपथपत्र दाखल करण्यात आले नाही, त्यामुळे नियोजीत परीक्षेचा निकाल राखून ठेवणे उचित ठरेल असे न्यायधिकर्नने म्हटले आहे. पुढील सुनावणी दि. २५ नोव्हेंवर २०२१ रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. चैतन्य धारूरकर हे बाजू मांडत आहेत.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकार