शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

शेतकऱ्यांचा सत्याग्रह; सर्व कर्जमुक्तीची मागणी

By admin | Updated: May 4, 2016 01:29 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर

औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या बेमुदत ‘आक्रोश सत्याग्रहा’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. मराठवाड्यातून आलेल्या हजारो शेतकरी आंदोलकांना माघार घेण्यासाठी विभागीय प्रशासनाकडून उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी विनवणी केली; परंतु त्यांनी माघार घेतली नाही. शेतकऱ्यांनी रात्रभर मुक्कामी आंदोलन सुरू केले.मुख्यमंत्री चर्चेसाठी तारीख देत नाहीत तोपर्यंत सत्याग्रह सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे शेतकऱ्यांनी महामुक्काम आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने १५ दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले; परंतु एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून बेमुदत शेतकरी आक्रोश सत्याग्रह सुरू केला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, खरीप हंगामात मोफत बियाणे, खते, रोहयोमध्ये पेरणी, खुरपणी, काढणी या कामांचा समावेश करावा, मागेल त्याला मग्रारोहयोमध्ये काम उपलब्ध करून द्यावे. नसता प्रतिदिन ३०० रुपये मानधन द्यावे, सर्व कष्टकऱ्यांना २ रुपये भावाने महिन्याला १० किलो धान्य द्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत द्यावी, दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, पिण्यासाठी जनावरांसाठी गावोगाव पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रतिदिन रोख ८० रुपये अर्थसाह्य द्यावे. आदी मागण्यांसाठी सत्याग्रह केला जात आहे. सत्याग्रहात किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. ढवळे, राज्याध्यक्ष दादा रायपुरे, जे. पी. गावीत, किसान गुजर, अर्जुन आडे, डॉ. विठ्ठल मोरे, रामकृष्ण शेरे, डॉ. नवले, उद्धव पौळ, विलास बाबर, लिंबाजी कचरे, दीपक लिपणे, भाऊसाहेब झिरपे आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाला डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. राम बाहेती, लक्ष्मण भोजणे यांनी पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य झाल्या तरच माघार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी किसान सभेसोबत चर्चेची तयारी दर्शवली होती; परंतु त्यांनी वेळ दिला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री चर्चा करणार नाही आणि मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले. उद्या ४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज बंद करण्याचा इशारा डॉ. नवले यांनी दिला.