शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सत्याग्रह; सर्व कर्जमुक्तीची मागणी

By admin | Updated: May 4, 2016 01:29 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर

औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे भाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अ. भा. किसान सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या बेमुदत ‘आक्रोश सत्याग्रहा’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. मराठवाड्यातून आलेल्या हजारो शेतकरी आंदोलकांना माघार घेण्यासाठी विभागीय प्रशासनाकडून उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी विनवणी केली; परंतु त्यांनी माघार घेतली नाही. शेतकऱ्यांनी रात्रभर मुक्कामी आंदोलन सुरू केले.मुख्यमंत्री चर्चेसाठी तारीख देत नाहीत तोपर्यंत सत्याग्रह सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे शेतकऱ्यांनी महामुक्काम आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने १५ दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले; परंतु एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून बेमुदत शेतकरी आक्रोश सत्याग्रह सुरू केला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, खरीप हंगामात मोफत बियाणे, खते, रोहयोमध्ये पेरणी, खुरपणी, काढणी या कामांचा समावेश करावा, मागेल त्याला मग्रारोहयोमध्ये काम उपलब्ध करून द्यावे. नसता प्रतिदिन ३०० रुपये मानधन द्यावे, सर्व कष्टकऱ्यांना २ रुपये भावाने महिन्याला १० किलो धान्य द्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत द्यावी, दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, पिण्यासाठी जनावरांसाठी गावोगाव पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रतिदिन रोख ८० रुपये अर्थसाह्य द्यावे. आदी मागण्यांसाठी सत्याग्रह केला जात आहे. सत्याग्रहात किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. ढवळे, राज्याध्यक्ष दादा रायपुरे, जे. पी. गावीत, किसान गुजर, अर्जुन आडे, डॉ. विठ्ठल मोरे, रामकृष्ण शेरे, डॉ. नवले, उद्धव पौळ, विलास बाबर, लिंबाजी कचरे, दीपक लिपणे, भाऊसाहेब झिरपे आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाला डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. राम बाहेती, लक्ष्मण भोजणे यांनी पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य झाल्या तरच माघार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी किसान सभेसोबत चर्चेची तयारी दर्शवली होती; परंतु त्यांनी वेळ दिला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री चर्चा करणार नाही आणि मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले. उद्या ४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज बंद करण्याचा इशारा डॉ. नवले यांनी दिला.