शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:15 IST

ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही.

औरंगाबाद : सुभाष झांबड यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यापासून आ. अब्दुल सत्तार यांची वाढलेली अस्वस्थता सतत वाढतच आहे. ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारची कोंडी होऊन अस्वस्थता वाढत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांना चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नसल्याने, तर ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.काँग्रेसचा तुम्ही राजीनामा दिला; पण तो स्वीकारला कुठे, असे विचारता, सत्तार म्हणाले की, हा त्यांचा प्रश्न आहे. नाही तर त्यांनी माझी हकालपट्टी करावी.

देवेंद्र फडणवीस एक चांगला माणूस आहे. आम्हाला भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे; पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाही, असा टोला सत्तार यांनी लगावला. सत्तार यांची बंडखोरी स्थानिक वा जिल्हा पातळीवरही कुणी गांभीर्याने घेतली नाही. कोणत्याही छोट्या-मोठ्या पुढाऱ्याने सत्तार यांची मनधरणी केली नाही. अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नाही आणि दिल्लीतूनही काहीच प्रतिसाद नसल्याने अस्वस्थतेत भर पडत गेली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची रात्री भेट घेतली.

आ. सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच दि.२३ मार्च रोजी सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकवले. सकाळीच इकडे झांबड यांच्यावर तिकीट मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असताना तिकडे सत्तार यांनी मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर रातोरात मुंबई गाठून वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

२९ मार्च रोजी आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा भरवून आ. सत्तार यांनी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही काँग्रेसकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. उलट या मेळाव्यात सत्तार समर्थकांनी तुम्ही, लोकसभा लढवा; पण काँग्रेसकडून... अपक्ष नको, असा कौल दिला असतानाही काल सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा आपल्याच समर्थकांचा त्यांनी केलेला अपमान होय, असा अर्थ काढला जात आहे.

आता भाजपमध्ये जाणार नाही व काँग्रेसचाही प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. मग अपक्ष म्हणून भरलेला अर्ज ते मागे घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ८ एप्रिलपर्यंत आणखी काय काय घटना घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद