शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:15 IST

ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही.

औरंगाबाद : सुभाष झांबड यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यापासून आ. अब्दुल सत्तार यांची वाढलेली अस्वस्थता सतत वाढतच आहे. ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारची कोंडी होऊन अस्वस्थता वाढत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांना चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नसल्याने, तर ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.काँग्रेसचा तुम्ही राजीनामा दिला; पण तो स्वीकारला कुठे, असे विचारता, सत्तार म्हणाले की, हा त्यांचा प्रश्न आहे. नाही तर त्यांनी माझी हकालपट्टी करावी.

देवेंद्र फडणवीस एक चांगला माणूस आहे. आम्हाला भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे; पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाही, असा टोला सत्तार यांनी लगावला. सत्तार यांची बंडखोरी स्थानिक वा जिल्हा पातळीवरही कुणी गांभीर्याने घेतली नाही. कोणत्याही छोट्या-मोठ्या पुढाऱ्याने सत्तार यांची मनधरणी केली नाही. अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नाही आणि दिल्लीतूनही काहीच प्रतिसाद नसल्याने अस्वस्थतेत भर पडत गेली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची रात्री भेट घेतली.

आ. सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच दि.२३ मार्च रोजी सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकवले. सकाळीच इकडे झांबड यांच्यावर तिकीट मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असताना तिकडे सत्तार यांनी मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर रातोरात मुंबई गाठून वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

२९ मार्च रोजी आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा भरवून आ. सत्तार यांनी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही काँग्रेसकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. उलट या मेळाव्यात सत्तार समर्थकांनी तुम्ही, लोकसभा लढवा; पण काँग्रेसकडून... अपक्ष नको, असा कौल दिला असतानाही काल सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा आपल्याच समर्थकांचा त्यांनी केलेला अपमान होय, असा अर्थ काढला जात आहे.

आता भाजपमध्ये जाणार नाही व काँग्रेसचाही प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. मग अपक्ष म्हणून भरलेला अर्ज ते मागे घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ८ एप्रिलपर्यंत आणखी काय काय घटना घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद