शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:15 IST

ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही.

औरंगाबाद : सुभाष झांबड यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यापासून आ. अब्दुल सत्तार यांची वाढलेली अस्वस्थता सतत वाढतच आहे. ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारची कोंडी होऊन अस्वस्थता वाढत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांना चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नसल्याने, तर ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.काँग्रेसचा तुम्ही राजीनामा दिला; पण तो स्वीकारला कुठे, असे विचारता, सत्तार म्हणाले की, हा त्यांचा प्रश्न आहे. नाही तर त्यांनी माझी हकालपट्टी करावी.

देवेंद्र फडणवीस एक चांगला माणूस आहे. आम्हाला भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे; पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाही, असा टोला सत्तार यांनी लगावला. सत्तार यांची बंडखोरी स्थानिक वा जिल्हा पातळीवरही कुणी गांभीर्याने घेतली नाही. कोणत्याही छोट्या-मोठ्या पुढाऱ्याने सत्तार यांची मनधरणी केली नाही. अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नाही आणि दिल्लीतूनही काहीच प्रतिसाद नसल्याने अस्वस्थतेत भर पडत गेली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची रात्री भेट घेतली.

आ. सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच दि.२३ मार्च रोजी सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकवले. सकाळीच इकडे झांबड यांच्यावर तिकीट मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असताना तिकडे सत्तार यांनी मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर रातोरात मुंबई गाठून वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

२९ मार्च रोजी आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा भरवून आ. सत्तार यांनी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही काँग्रेसकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. उलट या मेळाव्यात सत्तार समर्थकांनी तुम्ही, लोकसभा लढवा; पण काँग्रेसकडून... अपक्ष नको, असा कौल दिला असतानाही काल सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा आपल्याच समर्थकांचा त्यांनी केलेला अपमान होय, असा अर्थ काढला जात आहे.

आता भाजपमध्ये जाणार नाही व काँग्रेसचाही प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. मग अपक्ष म्हणून भरलेला अर्ज ते मागे घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ८ एप्रिलपर्यंत आणखी काय काय घटना घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद