शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सतरा मुन्नाभाई..!

By admin | Updated: February 12, 2015 00:56 IST

उस्मानाबाद : चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.

उस्मानाबाद : चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे अशा डॉक्टरांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर मात्र, अशा बोगस डॉक्टरांविरूद्ध एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. आजघडील जिल्ह्याच्या विविध भागात १७ बोगस डॉक्टर (मुन्नाभाई) वैधकीय व्यवसाय करीत आहेत. ही बाब आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. असे असतानाही संबंधितांविरूद्ध कारवाई का होत नाही? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल १३८ डॉक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे समोर आले होते. हा जीवघेणा प्रकार लक्षात घेवून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात बोगस डॉक्टरांविरूद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी अचानक छापे मारून तब्बल ८० बोगस डॉक्टरांविरूद्ध पोलिस कारवाई करण्यात आली. तर कारवाईची कुणकुण लागताच उर्वरित डॉक्टर पसार झाले होते. या धडक कारवाईनंतर बोगस डॉक्टरांना चाप बसला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात अशा स्वरूपाची एकही धडक कारवाई होवू शकली नाही. त्यामुळे अनधिकृत डॉक्टरांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आॅक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्याच्या विविध भागात १७ डॉक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या ही अधिक आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ११ डॉक्टर हे ग्रामीण भागात तर ६ डॉक्टर हे शहरी भागात आहेत. (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोगस डॉक्टरांविरूद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेचा धसका घेवून ४१ डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. असे असले तरी यातील अनेकांनी गावे बदलून दवाखाने थाटले आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांचा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाकडून आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने १७ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. याचे सर्वाधिक प्रमाण उस्मानाबाद, त्यानंतर उमरगा तालुक्यात आहे. तर तुळजापूर, वाशी आणि कळंब या तीन तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आला आहे.