शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

सातारा-देवळाईकरांना पुन्हा ‘गाजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:54 IST

‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.

ठळक मुद्देनागरिक संतप्त : औरंगाबादेत मोर्चा काढूनही समस्यांवर उपाय नाही; समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन महापौर आज देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.सातारा-देवळाईकरांचा निषेध मोर्चा रेणुकामाता मंदिर कमानीपासून गुरुवारी दुपारी काढण्यात आला. मोटारसायकली तसेच खाजगी बसमधून महिलांचा मोर्चा मनपा मुख्य कार्यालयावर धडकला. ‘टॅक्स घ्या, पण सुविधा द्या, मनपापेक्षा ग्रामपंचायत बरी, सातारा देवळाई झाले भकास, लवकर करा विकास, सातारा-देवळाईला मनपाने दिले गाजर, विकास आमचा हक्काचा नाही तुमच्या मनाचा, रस्ते करा रस्ते करा सातारा देवळाईचे रस्ते करा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.प्रवेशद्वारासमोर मोर्चेकºयांची प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्याने महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, राजू वैद्य, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब जगताप, सिद्धांत शिरसाट हे मोर्चेकºयास समोरे येऊन त्यांनी सर्वांच्या व्यथा ऐकून घेतल्या. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन या प्रमुख मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन गेल्या दोन महिन्यांपूर्वी नागरिकांच्या भेटी घेऊन दिले. मात्र, त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी महापौर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.मीटिंग सुरू असून उद्या लेखी देऊसमस्या सोडविण्याविषयी लेखी आश्वासन द्यावे, तोंडी आम्ही ऐकणार नाही असा पवित्रा मोर्चेकºयांनी घेतल्याने महापौर यांनी सांगितले की, आज सभा सुरू असून, तुमची गाºहाणी ऐकण्यासाठी मी स्वत: बाहेर आलो आहे. ड्रेनेज व रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून कामे मार्गे लागणार आहेत; परंतु नागरिकांनी लेखी आश्वासनाचा आग्रह धरल्याने वेळ मारून नेत महापौर यांनी उद्या तुमचे एक शिष्टमंडळ कार्यालयात या, लेखी आश्वासन देण्यात येईल, असे म्हणून महापौर यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी काढता पाय घेतला. पुन्हा सातारा-देवळाईकरांंना मनपाने ‘गाजर’ दाखविल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट तयार झाली.टॅक्स घ्या मात्र सुविधा द्या४परिसरात सेवा-सुुविधा पुरवून टॅक्स घ्यावा, नुसते मतापुरताच सातारा-देवळाईचा वापर नसावा, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चात सोमीनाथ शिराणे, पद्मसिंग राजपूत, रमेश बाहुले, आबासाहेब देशमुख, संजय कुलकर्णी, रामेश्वर पेंढारे, राजू कुलकर्णी, असद पटेल, सलीम पटेल, लक्ष्मण किर्दक, राहुल शिरसाट, हनुमान कदम, छोटू कदम, दिनेश चव्हाण, सूरज बडग, सचिन पैठणे, हकिम पटेल, मनोज शितोळे, महेंद्र रमंडवाल, मुकेश गोरे, रणजित ढेपे, गणेश येवले, अजिंक्य गायकवाड, गुलाब पवार, स्मिता पठारे, रंजना देसाई, पंकज सोनार, अर्चना राणा, सचिन कांबळे, के.आर. मोरे, कांताबाई मोरे, मार्तंड कुलकर्णी, सुवर्णा सोळुंके, बबिता विक्टोरिया, सुमन पाटील, नीलेश चाबूकस्वार, गोविंद पाटील, महेश नाईक, राजेश निंदमवार, सुनीता महाजन, योगिता होलीय आदींसह शेकडो महिला व नागरिकांचा सहभाग होता.