शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

फटाक्यांच्या आवाजामुळे पसरला भाजपत सन्नाटा

By admin | Updated: September 12, 2014 00:05 IST

हिंगोली : भाजपची उमेदवारी अजून कोणाला मिळाली हे जाहीर झाले नसले तरी आडगाव, कनेरगाव व हिंगोलीत फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने काही जणांना कानठळ्याच बसल्या आहेत.

हिंगोली : भाजपची उमेदवारी अजून कोणाला मिळाली हे जाहीर झाले नसले तरी आडगाव, कनेरगाव व हिंगोलीत फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने काही जणांना कानठळ्याच बसल्या आहेत. त्यामुळे भाजपात एक वेगळाच सन्नाटा पसरला असून उमेदवारी जाहीर झाली की काय? अशी विचारणा होत आहे. काहींनी तर तक्रारीचाच सूर आळवला आहे.भाजपात कधी नव्हे, एवढी सध्या उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. ज्यांच्या नावामागे थोडेही वलय आहे, अशांना थेट आमदार झाल्याचीच स्वप्ने पडत आहेत. त्यातच लोकसभेतील यश अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना खुणावत आहे. घरचे झाले थोडे अन् व्याहाने धाडले घोडे या उक्तीचा प्रत्ययही मूळ भाजपकरांना येत आहे. मागील निवडणुकीत भाजपला निसटता पराभव पत्करावा लागला होता. यावेळी इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वांनाच हा फरक कमी होईल, असे वाटत होते. मात्र त्यासाठी हवी असलेली एकी बेकीत परावर्तीत होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या. काहीजणांना व्यासपीठाच्या कोपऱ्यावरही स्थान मिळाले नाही. ही नाराजी वाऱ्यासारखी पसरली. हा किस्सा चर्चाविरामात जातो न जातो तोच आता उमेदवारीच्या फटाक्यांची चर्चा रंग धरू लागली. काहीजण जाहीरपणे त्यावर बोलू लागले आहेत. अजून पक्षाने कुणालाही अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली नसताना फटाके फुटलेच कसे ? असा सवाल केला जात आहे. त्यासाठी काहींनी पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार केली. माध्यमांपर्यंत ही चर्चा पोहोचेल, अशी व्यवस्थाही करण्यासाठी भाजपाच्या गोटातीलच काहींनी प्रयत्न चालविले. मात्र उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. यामागे काहीतरी षडयंत्र आहे, एवढी बोलकी प्रतिक्रिया दिली जात आहे. परंतु नाराजीचा सूर वेगळे वळण घेईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपाच्या या फटाकेबाजीमुळे खदखद असली तरी वरवरची शांतता आहे.(प्रतिनिधी)