शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Video: दगडाला पाझर नाही कंठ फुटला; सुलीभंजन पर्वतावरील शिळेतून निघतात सप्तसूर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 10, 2023 17:31 IST

अभ्यासकांनी सांगितले शिळेतून येणाऱ्या सप्तसुरांमागील विज्ञान

छत्रपती संभाजीनगर : दगडाला पाझर फुटत नाही, असे म्हटले जाते; पण जेव्हा याच दगडातून सप्तसूर बाहेर पडतात तेव्हा... तुम्ही म्हणाल ‘आता हे काय नवीन.’ मात्र, हे नवीन काहीच नाही, जुनेच आहे. सुलीभंजन पर्वतावर एक ‘शिळा’ अशी आहे की, तिच्यावर छोट्या दगडाने वाजविले, तर असा सप्तसूर निर्माण होतात. होय, जिथे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांना साक्षात भगवान दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते. आता तुमच्याही मनात सुलीभंजन पर्वताला भेट देण्याचे कुतूहल निर्माण झाले असेल.

छत्रपती संभाजीनगरापासून अवघ्या ३० ते ३५ कि.मी. अंतरावर खुलताबादकडून वेरूळकडे जाताना डाव्या हाताला वळल्यास सुलीभंजन पर्वताकडे जाण्याचा रस्ता दिसतो. श्री दत्ताच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या या जागेवर आता मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरासमोरच संजीवनी शिला नावाची पाटी दिसते. तिथे असलेल्या एका भव्य आकारातील दगडावर सर्वांचे लक्ष जाते. पांढऱ्या रंगाच्या शिळेवर असंख्य छिद्र पडलेले दिसाता. याच शिलेवर एक छोटासा दगड ठेवण्यात आला आहे, तो लहान दगड घेऊन त्या शिळेवर वाजविले, तर घंटीसारखा ‘टन टन’ आवाज येतो, दगडाच्या वेगवेगळ्या भागात वाजविले, तर सप्तसूर बाहेर पडतात. हे अनुभवून भाविक अचंबित होतात. बच्चे कंपनी तर जाम खुश होऊन जाते. मागील अनेक वर्षांपासून शिळा तेथेच आहे. येथे दर्शनासाठी येणारा असा कोणताही भक्त नसेल त्याला याविषयी कुतूहल निर्माण झाले नसेल. यामुळेच प्रत्येक जण या शिळेवर दगडाने वाजवतो व सप्तसुरांचा आनंद घेतो.

त्या शिळेमागे विज्ञानचसंत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते. तेव्हा दर गुरुवारी ते आपल्या आवडत्या शिष्याला घेऊन सुलीभंजन पर्वतावर जात. तिथे नाथ महाराज साधना करीत. त्याचठिकाणी त्यांना श्री गुरुदत्ताचे दर्शन घडले. पोथ्या, पुराण व शिलालेखांचा अनेक वर्षे अभ्यास केला व नंतर ती जागा शोधून काढली, ती म्हणजे तपोभूमी श्रीक्षेत्र सुलीभंजन पर्वत याच ठिकाणी एक मोठा दगड आहे. त्यातून सप्तसूर निघतात. या पाठीमागील विज्ञान काय आहे, हे शोधणे आवश्यक आहे.- डॉ. कुमुद गोसावी, नाथ वंशज

ज्वालामुखीतून तयार झालेला खडकसुमारे ६५ हजार कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखी झाला होता. त्यातून निर्माण झालेल्या खडकास ‘बेसाल्ट’ असे म्हटले जाते. शहरातून उत्तर बाजूने जो डोंगर जातो त्यास दख्खन का पठार म्हणतात. तो ज्वालामुखीतून निर्माण झालेला आहे. लाव्हारस बाहेर आल्यावर त्यात वेगवेगळे वायू असतात. धर्तीवरील वातावरण थंड असल्याने लाव्हारसाचा पृष्ठभाग लवकर थंड होतो; पण आत वायू असल्याने दगडाच्या आतून पोकळी निर्माण होते. यामुळे त्या दगडावर लहान दगडाने वाजविले तर ‘टन टन’ आवाज निर्माण होतो. सुलीभंजन पर्वतावरील तो दगड म्हणजे ‘बेसाल्ट’ होय.-प्राचार्य अशोक तेजनकर, भूवैज्ञानिक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक