शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार; जलसाठे जोत्याखालीच

By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात संततधार तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांची झड अनेक वर्षांनंतर नागरिक अनुभवत असून

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात संततधार तर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांची झड अनेक वर्षांनंतर नागरिक अनुभवत असून, गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली संततधार सुमारे सहा तास सुरू होती. पावसाने जलसाठ्यात वाढ झालेली असली तरी सततच्या पावसाने मका पिवळा पडत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजता पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तीन वाजेपर्यंत सतत पडला होता. फुलंब्री येथील आठवडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्याची फजिती झाली. कारण या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. त्यात पावसाने चिखल झाला. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत मोजकेच ग्राहक बाजारात दिसत होते, तर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून घरी जाणेच पसंत केले. फुलंब्री टी पॉइंटवर व खुलताबाद रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते .रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी जाण्याची व्यवस्था केली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर होते. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३१९ मी.मि. पाऊस पडला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सततच्या पावसाने पाणी शेतात तुंबत असल्याने अनेक भागांतील जमिनी चिभडत आहेत.सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात सर्वत्र यावर्षी रिमझिम पाऊस झाला. दिसायला पाऊस ३२२.१३ मि.मी.पाऊस झाला असला तरी तालुक्यातील सर्व धरणे अजूनही कोरडी आहेत. पिकांसाठी आवश्यक पाऊस पडल्याने पिके डोलत असली तरी मोठा पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सतावणार आहे.सिल्लोड तालुक्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा धरणात अजूनही मृत साठा आहे. याशिवाय उंडणगाव,रहिमाबाद धरणात मृत साठा आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात १५.६८ % पाणी साठा आहे, तर केळगाव मध्यम प्रकल्पात २३.७३% पाणी साठाआहे.मंडळनिहाय पडलेला पाऊससिल्लोड तालुक्यात यावर्षी जुलैअखेर सर्वात जास्त सिल्लोड शहरात ४१५ मि.मी.पाऊस झाला, तर सर्वात कमी २०० मि.मी. बोरगाव बाजार मंडळात पाऊस झालाआहे. अजिंठा मंडळात ३२७ मि.मी., आमठाणा २८९, गोळेगाव २६३,निल्लोड २९७, पाऊस झाला आहे.मागील वर्षी जुलैपर्यंत १८३ मि.मी.पाऊस झाला होता. त्यात सिल्लोड मध्ये १६२ मि.मी.,भराडी १८८ मि.मी., अंभई ३५६ मि.मी.,अजिंठा १५५ मि.मी.,आमठाणा २२३ मि.मी., गोळेगाव ११६ मि.मी., निल्लोड १८६ मि.मी., बोरगाव बाजार १६६ मि.मी. पाऊस झाला होता.त्या तुलनेत यावर्षी जुलैपर्यंत ३२२ मि.मी. म्हणजे चांगला पाऊस झाला आहे. ३२२ मि.मी. झालेल्या पावसाने जमिनीचे पोट भरून विहिरींना पाझर फुटला आहे. जमिनीची पाणी पातळी काही अंशी वाढली आहे.कन्नड : तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मात्र, हलक्या स्वरूपाचा संततधार पाऊस असल्याने नद्यांना मोठे पूर आले नाहीत. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असला तरी हलक्या सरींबरोबर मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; त्यामुळे धरणांमधील मृत पाणीसाठ्यांमध्ये फक्त भर पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात भर पडलेली असली तरी अजूनही मृतसाठाच आहे. धरणात सुरू असलेली आवक पाहता मंगळवारी रात्रीतून मृतसाठा ओलांडून उपयुक्त जलसाठ्यास सुरुवात होईल, असे कालवा निरीक्षक जे.डी. जैस्वाल यांनी सांगितले. तालुक्यातील इतर जलसाठ्यांच्या पाणीपातळीची माहिती मिळू शकली नाही.तालुक्याची वार्षिक सरासरी ७४९ मि.मी. आहे. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात सरासरी ३४३.३६ पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस चापानेर (२६० मि.मी.) व चिकलठाण (२६१ मि.मी.) या महसूल मंडळात पडला असून सर्वात जास्त पाऊस कन्नड (४०९ मि.मी.) महसूल मंडळात झाला आहे. त्याखालोखाल देवगाव (४०७ मि.मी.), पिशोर ३०३, नाचनवेल ३८३, करंजखेडा ३७४ व चिंचोली ३६० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.