शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मे २०२१ पर्यंत ‘समृद्धी महामार्ग’ वाहतुकीसाठी खुला होणार - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:35 IST

डिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात महामार्गाची लांबी ११२ किलोमीटर आहे. कामे डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गातीलऔरंगाबाद जिल्ह्यांतर्गत ११० कि.मी.चा पट्टा असून नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर एसएसआरडीसीच्या यंत्रणेने गुरुवारी आढावा बैठकीत केला.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग २११, समृद्धी महामार्ग व इतर रस्ते योजनांचा आढावा घेत जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामासाठी संबंधित यंत्रणांनी सोपविलेली कामे डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले. १ मे २०२१ रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे अभियंता साळुंखे यांनी सांगितले. 

रस्ते दुरुस्तीच्या कामांत प्राधान्य द्या. वैजापूर-औरंगाबाद रस्ता दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया या यंत्रणांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करून दुरुस्ती सुरू करावी. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती मुदतीत कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते. 

समृद्धीची पाहणी करणारडिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. जिल्ह्यात महामार्गाची लांबी ११२ किलोमीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा प्रस्तावित आहे. 

एनएच-२११ चे काम फक्त ७ कि.मी.जिल्ह्यातून १२१ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यापैकी ७ कि.मी. काम पूर्ण झाले असून करोडी ते औरंगाबाद आणि करोडी ते तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई