शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मे २०२१ पर्यंत ‘समृद्धी महामार्ग’ वाहतुकीसाठी खुला होणार - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:35 IST

डिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात महामार्गाची लांबी ११२ किलोमीटर आहे. कामे डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गातीलऔरंगाबाद जिल्ह्यांतर्गत ११० कि.मी.चा पट्टा असून नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर एसएसआरडीसीच्या यंत्रणेने गुरुवारी आढावा बैठकीत केला.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग २११, समृद्धी महामार्ग व इतर रस्ते योजनांचा आढावा घेत जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामासाठी संबंधित यंत्रणांनी सोपविलेली कामे डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले. १ मे २०२१ रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे अभियंता साळुंखे यांनी सांगितले. 

रस्ते दुरुस्तीच्या कामांत प्राधान्य द्या. वैजापूर-औरंगाबाद रस्ता दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया या यंत्रणांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करून दुरुस्ती सुरू करावी. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती मुदतीत कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते. 

समृद्धीची पाहणी करणारडिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. जिल्ह्यात महामार्गाची लांबी ११२ किलोमीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा प्रस्तावित आहे. 

एनएच-२११ चे काम फक्त ७ कि.मी.जिल्ह्यातून १२१ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यापैकी ७ कि.मी. काम पूर्ण झाले असून करोडी ते औरंगाबाद आणि करोडी ते तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई