शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

By विकास राऊत | Updated: December 1, 2022 13:30 IST

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारी सुरू केली असून, पंतप्रधान मोदी या मार्गाची किमान औरंगाबादपर्यंत हवाई पाहणी करण्याची शक्यता एमएसआरडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरून काही सूचना नाहीत, मात्र तारीख निश्चित मानली जात आहे. लोकार्पणासाठी समिती स्थापन होईल. समितीमध्ये लोकार्पणाशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. हवाई पाहणीसाठी वेळ नसल्यास वाहनाने काही अंतरापर्यंत पंतप्रधान समृद्धीवरून प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

जिल्ह्यात ११२ कि.मी. लांबीचा समृद्धीचा ३४०० कोटींचा टप्पा लोकार्पणासाठी सज्ज आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेल्याने दोन विभाग काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम ३.४०० कोटींतून पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा असून, तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे.

१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम१६ पॅकेजेसमध्ये महामार्गाचे काम झाले आहे. ८, ९ आणि १० ही तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग गेला आहे.

जिल्ह्यातील ६१ गावांतून महामार्गऔरंगाबाद जिल्ह्यातील ६१ गावांतील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. १,६०० कोटींच्या आसपास भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला आहे. जिल्ह्यात हर्सूलजवळ इंटरचेंज आहे. बोगद्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मध्यंतरी अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे वेगमर्यादा ताशी १५० कि.मी.वरून १२० केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद