शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:34 IST

Martyr Kailash Pawar : शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. यावेळी लष्करातर्फे त्यांच्या पार्थिवास सलामी देण्यात आली.

ठळक मुद्देलष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर येणार होते

औरंगाबाद : सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून खाली कोसळल्यामुळे लष्करातील जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आले. चिखली (जि. बुलडाणा) येथील वीरपुत्र शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. लष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली.

पवार यांची ड्युटी १ ऑगस्टला संपली होती. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर ते चिखलीला येणार होते. मात्र, बर्फाळ डोंगर उतरताना दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीहून मुंबईमार्गे औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्कारातर्फे त्यांना सलामी देण्यात आली. याप्रसंगी ब्रिगेडियर उपेंदरसिंग आनंद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, तहसीलदार ज्योती पवार, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे ‘सीआयएसएफ’चे जवान उपस्थित होते. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होतीचिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे गेल्या २ आॅगस्ट २०२० पासून महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. हिमालय पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अश्या अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. अश्या अत्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात कैलास पवार यांची एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होती. 

सियाचीन येथे होते तैनात आपल्या सहकाऱ्यांसह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. त्यानुषंगाने त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरून घरंगळत जावून खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या जवानांनी त्यांना तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान १ आॅगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :MartyrशहीदAurangabadऔरंगाबादbuldhanaबुलडाणाIndian Armyभारतीय जवान