शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरात सॅनिटायझरची विक्री ९५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरोघरी सॅनिटायझरने बाटल्या भरलेल्या असायच्या. घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात असे. मात्र, अनलॉक ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरोघरी सॅनिटायझरने बाटल्या भरलेल्या असायच्या. घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला जात असे. मात्र, अनलॉक सुरू झाले, लसीकरणामुळे शहरवासीयांमध्ये बिनधास्तपणा आला आणि सॅनिटायझरचा विसर पडला. अनेक घरात सॅनिटायझर विना बाटल्या कानाकोपऱ्यात धूळ खात आहेत. कोरोना काळात महिन्याला दीड लाख लिटर सॅनिटायझरची विक्री होत होती. मात्र, अनलॉकनंतर ही विक्री अवघ्या दहा हजार लिटरवर आली आहे.

कोरोनाचा धोका टळलेला नाही. प्रत्येकाने मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जात आहे. मात्र, शहरात अजूनही २० ते २२ टक्के नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून सॅनिटायझरची विक्री तब्बल ९० टक्क्यांनी घटली आहे. केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सॅनिटायझरची विक्री महिन्याकाठी दीड लाख लिटर एवढी होती. कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यामुळे लोकांनी सॅनिटायझर खरेदी करणे कमी केेले होते. मात्र, पुन्हा फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेमुळे सेनिटायझरची विक्री वाढली. नंतर कोरोना प्रतिबंधक लस जानेवारीपासून आरोग्य केंद्रात उपलब्ध झाली. यामुळे निर्बंध असतानाही लोक निर्बंधमुक्त झाल्यासारखे वावरत होते. लस आली आणि सॅनिटायझरची विक्री घटली. आता शहरवासीय एवढे बिनधास्त झाले की, सॅनिटायझरच्या बाटल्या, कॅन अडगळीत पडले आहेत. सॅनिटायझरची जून महिन्यात केवळ १० हजार लिटर विक्री झाली. जुलैमध्ये हीच परिस्थिती आहे.

दुकानात, कार्यालयात शोभेची वस्तू

अनेक दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये, सरकारी कार्यालयात सॅनिटायझरच्या बाटल्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. स्टँडवर सॅनिटायझरची बाटली ठेवलेली असते; पण तिचा वापर कोणी करत नाही. एक बाटलीतील सॅनिटायझर संपायला १५ ते २० दिवस लागतात. मागील वर्षी दोन ते तीन दिवसांत बाटली संपत असे, असे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चौकट

किंमत घटली तरी मागणीत वाढ नाही

मागील वर्षी सॅनिटायझरचे ५ लिटरचे एक कॅन एक हजार रुपयांपर्यंत विक्री होत असे. मात्र, नंतर त्याच्या किमती कमी झाल्या. सध्या ५ लिटरचे कॅन ३५० ते ५०० रुपये दरम्यान मिळत आहे. किमती कमी होऊनही सॅनिटायझरचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाला.