राजेश खराडे , बीडथकबाकीच्या कचाट्यात महावितरण काढता पाय घेत असतानाच एक ना अनेक समस्यांनी या विभागाला ग्रासले जात आहे. महिन्याभरापुर्वी झालेल्या वदळी वाऱ्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्याचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या दोन महिन्यापासून दुरूस्तीच्या नावाखाली खेडेगावे अंधारात आहेत. त्यामुळे त्रस्त ग्राहकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पावसळ्याच्या हंगामापुर्वी महावितरणची पेट्रोलिंग मोहिम सुरू होती. ही मोहिम संपताच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पहिले पाढे पच्चावन्न असे होत ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. यामध्ये सर्वाधिक फटका वडवणी व आष्टी तालुक्यातील ग्राहकांना बसला आहे. वादळी वाऱ्याने विद्युत पोल झुकणे, कंडक्टर तुटने, इंन्सुलेटर फुटने, विद्युत तारांची स्पार्कींग तसेच डी.पी.ची स्ट्रक्चर तुटने यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागात झालेल्य.ा नुकसानीकडे महावितरण कंपनीने वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जन-जिवन विस्कळीत झाले आहे.दळनापासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आष्टी तालुक्यातील महाजनवाडी येथील विद्युत पुरवठा तब्बल महिन्याभरापासून खंडित होता त्यामुळे विद्युत ग्राहकांनी आंदोलनचा पवित्रा घेतला होता. सध्या माजलगांव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा होत नसल्याने आक्रमक घालेल्या ग्रामस्थांनी थेट अभियंत्याच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. शहरातील दुरूस्त्या त्वरीत मार्गी लावल्या जातात मात्र ग्रामीण भागातील दुरूस्तीकडे महावितरणचे दर्लक्ष होत असल्याचा आरोप ग०ामस्हृांकडून होत आहे. वेळ प्रसंगी ग्रामस्थांनाच दुरूस्तीचे काम करावे लागत आहे.गत आठवड्यात केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामस्थांनी सायकलवरून पाण्याची वाहतूक करून आर्थिंगला पाणीपुरवठा केला होता.
विजेअभावी ग्रामीण भाग चाचपडतोय अंधारातच
By admin | Updated: July 6, 2015 00:20 IST