शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

रुपीचे खातेदार लढा उभारणार

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला. या पुढे या बँकेच्या राज्यभरातील खातेदार, ठेवीदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्यायालयीन व सरकारी पातळीवरील लढा संयुक्तरीत्या उभारण्याचा निर्णय शहरातील बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर प्रशासक नेमला आहे व बँकेचा परवाना निलंबित केला आहे. तेव्हापासून बँकेत लाखो रुपये असूनही खातेदारांना ते काढणे कठीण झाले आहे. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शहरातील या बँकेच्या खातेदारांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. औरंगाबादेतील शाखेत साडेसहा हजार खातेदार असून त्यांच्या खात्यात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये अडकून पडले आहेत. खातेदारांना व्याजासह पैसे परत मिळावे यासाठी येथील खातेदार व ठेकेदारांनी एकत्र येऊन जुलै २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच ग्राहक मंचमध्ये बँकेच्या विरोधात २ दावे दाखल केले. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सर्वांना ई-मेलही पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रकाश नाईक यांनी दिली.पुणे येथे नुकतेच तेथील पुणेकर नागरिक कृती समिती, रुपी बँक कर्मचारी संघटनेने बँकेच्या संचालकांविरोधात आंदोलन उभे केले आहे. यापुढे आता राज्यात बँकेच्या जेथे जेथे शाखा होत्या तेथील खातेदार व ठेवीदारांच्या संघटनांना एकत्र करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच संघटनेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन मंदिरात होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण कोल्हारकर, राजेश मेहता, स्मिता देशपांडे, माया जोशी, गीता निधोनकर, कृष्णा कुलकर्णी, डॉ. श्यामराव पिसोळकर, प्रकाश तापी आदी खातेदार हजर होते. ५८ वर्षीय शशिकला सोरमारे या महिलेने सांगितले की, रुपी बँकेत खाते उघडले होते त्यात मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, बँक अचानक बंद झाली आणि मागील दीड- दोन वर्षांपासून आमची पैसे बँकेत अडकून पडले. या दरम्यान मुलीचे लग्न ठरले बँकेत रक्कम असूनही उपयोगात आली नाही. अखेर नातेवाईक, ओळखींच्या व्यक्तींकडून आम्ही पैसे उसने घेऊन ३० मे २०१४ रोजी लग्न लावले.माझे पती विठोबा सोरमारे हे पोस्ट खात्यात असून तेही ४ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी उसनी रक्कम घेतली ती फेडण्यासाठी आता तरी माझी रक्कम बँकेने परत द्यावी, नसता बँकेसमोर उपोषणाला बसेल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.