शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

रुपीचे खातेदार लढा उभारणार

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला. या पुढे या बँकेच्या राज्यभरातील खातेदार, ठेवीदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्यायालयीन व सरकारी पातळीवरील लढा संयुक्तरीत्या उभारण्याचा निर्णय शहरातील बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर प्रशासक नेमला आहे व बँकेचा परवाना निलंबित केला आहे. तेव्हापासून बँकेत लाखो रुपये असूनही खातेदारांना ते काढणे कठीण झाले आहे. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शहरातील या बँकेच्या खातेदारांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. औरंगाबादेतील शाखेत साडेसहा हजार खातेदार असून त्यांच्या खात्यात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये अडकून पडले आहेत. खातेदारांना व्याजासह पैसे परत मिळावे यासाठी येथील खातेदार व ठेकेदारांनी एकत्र येऊन जुलै २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच ग्राहक मंचमध्ये बँकेच्या विरोधात २ दावे दाखल केले. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सर्वांना ई-मेलही पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रकाश नाईक यांनी दिली.पुणे येथे नुकतेच तेथील पुणेकर नागरिक कृती समिती, रुपी बँक कर्मचारी संघटनेने बँकेच्या संचालकांविरोधात आंदोलन उभे केले आहे. यापुढे आता राज्यात बँकेच्या जेथे जेथे शाखा होत्या तेथील खातेदार व ठेवीदारांच्या संघटनांना एकत्र करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच संघटनेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन मंदिरात होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण कोल्हारकर, राजेश मेहता, स्मिता देशपांडे, माया जोशी, गीता निधोनकर, कृष्णा कुलकर्णी, डॉ. श्यामराव पिसोळकर, प्रकाश तापी आदी खातेदार हजर होते. ५८ वर्षीय शशिकला सोरमारे या महिलेने सांगितले की, रुपी बँकेत खाते उघडले होते त्यात मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, बँक अचानक बंद झाली आणि मागील दीड- दोन वर्षांपासून आमची पैसे बँकेत अडकून पडले. या दरम्यान मुलीचे लग्न ठरले बँकेत रक्कम असूनही उपयोगात आली नाही. अखेर नातेवाईक, ओळखींच्या व्यक्तींकडून आम्ही पैसे उसने घेऊन ३० मे २०१४ रोजी लग्न लावले.माझे पती विठोबा सोरमारे हे पोस्ट खात्यात असून तेही ४ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी उसनी रक्कम घेतली ती फेडण्यासाठी आता तरी माझी रक्कम बँकेने परत द्यावी, नसता बँकेसमोर उपोषणाला बसेल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.