शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रुपीचे खातेदार लढा उभारणार

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला. या पुढे या बँकेच्या राज्यभरातील खातेदार, ठेवीदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्यायालयीन व सरकारी पातळीवरील लढा संयुक्तरीत्या उभारण्याचा निर्णय शहरातील बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर प्रशासक नेमला आहे व बँकेचा परवाना निलंबित केला आहे. तेव्हापासून बँकेत लाखो रुपये असूनही खातेदारांना ते काढणे कठीण झाले आहे. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शहरातील या बँकेच्या खातेदारांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. औरंगाबादेतील शाखेत साडेसहा हजार खातेदार असून त्यांच्या खात्यात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये अडकून पडले आहेत. खातेदारांना व्याजासह पैसे परत मिळावे यासाठी येथील खातेदार व ठेकेदारांनी एकत्र येऊन जुलै २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच ग्राहक मंचमध्ये बँकेच्या विरोधात २ दावे दाखल केले. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सर्वांना ई-मेलही पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रकाश नाईक यांनी दिली.पुणे येथे नुकतेच तेथील पुणेकर नागरिक कृती समिती, रुपी बँक कर्मचारी संघटनेने बँकेच्या संचालकांविरोधात आंदोलन उभे केले आहे. यापुढे आता राज्यात बँकेच्या जेथे जेथे शाखा होत्या तेथील खातेदार व ठेवीदारांच्या संघटनांना एकत्र करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच संघटनेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन मंदिरात होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण कोल्हारकर, राजेश मेहता, स्मिता देशपांडे, माया जोशी, गीता निधोनकर, कृष्णा कुलकर्णी, डॉ. श्यामराव पिसोळकर, प्रकाश तापी आदी खातेदार हजर होते. ५८ वर्षीय शशिकला सोरमारे या महिलेने सांगितले की, रुपी बँकेत खाते उघडले होते त्यात मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, बँक अचानक बंद झाली आणि मागील दीड- दोन वर्षांपासून आमची पैसे बँकेत अडकून पडले. या दरम्यान मुलीचे लग्न ठरले बँकेत रक्कम असूनही उपयोगात आली नाही. अखेर नातेवाईक, ओळखींच्या व्यक्तींकडून आम्ही पैसे उसने घेऊन ३० मे २०१४ रोजी लग्न लावले.माझे पती विठोबा सोरमारे हे पोस्ट खात्यात असून तेही ४ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी उसनी रक्कम घेतली ती फेडण्यासाठी आता तरी माझी रक्कम बँकेने परत द्यावी, नसता बँकेसमोर उपोषणाला बसेल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.