शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सणासुदीच्या काळात पाण्यासाठी धावपळ

By admin | Updated: October 13, 2014 00:34 IST

औरंगाबाद : ढोरकीन पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा १२ दिवसांमध्ये तीन वेळा खंडित झाला. १२

औरंगाबाद : ढोरकीन पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा १२ दिवसांमध्ये तीन वेळा खंडित झाला. १२ तास वीजपुरवठा नसल्यामुळे ५६ एमएलडीची जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद होता. त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या तोंडावरच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. ११ आॅक्टोबर रोजी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सुटी असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली, तर खाजगी टँकर्सवाल्यांची चांदी झाली. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १ सप्टेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा ताब्यात घेतला आहे. १५ ते २३ सप्टेंबरपर्यंत जलवाहिन्यांच्या डागडुजीसाठी शटडाऊन घेतले. त्यानंतर आता विजेच्या लपंडावामुळे निर्जळीचा योग शहरवासीयांना आला आहे. शहरात पाण्याची बोंब सिडको- हडकोसह शहरात पाण्याची बोंब झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सिडकोतील अनेक वॉर्डांमध्ये पाण्याची अडचण होती. तशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या काळात निर्माण झाली आहे. आचारसंहिता असल्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या ड्यूटीवर आहेत, तर सत्ताधारी शिवसेना- भाजपाचे पदाधिकारी प्रचारात दंग आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे १ आॅक्टोबरपासून आजपर्यंत तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. महावितरण कंपनीने ढोरकीन येथील वीजपुरवठा १० ते १५ मिनिटांत सुरळीत होतो, असे सांगून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीलाच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होत असल्याचा दावा केला आहे. महावितरणने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर ठपका ठेवला. तर कंपनीने महावितरण वीजपुरवठा करीत नसल्याचा आरोप केला आहे.