शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी देवाकडे धावा

By admin | Updated: July 7, 2015 00:56 IST

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. पावसासाठी देवाकडे प्रार्थना करणे आणि शेतकऱ्यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नसल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. उपलब्ध पाण्याचा वापर करून आहेत ती पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. विभागात ५० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झालेल्या आहेत. काही जिल्ह्यांत पेरण्या झाल्या आहेत, तर काही जिल्ह्यांत झाल्याच नाहीत. उडीद, मुगाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर तूर, बाजरी, सोयाबीनचे उत्पादन सरासरी गाठेल. पाऊस १५ ते ३० दिवस लांबला तर कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय नियोजनाचा आराखडा तयार आहे, असेही ते म्हणाले. निसर्गासमोर प्रशासकीय यंत्रणादेखील हतबल झाली असून, संकटांचा सामना करण्यासाठी जनमानसांचे धैर्य वाढविण्यासाठी विभागीय पातळीवर प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. आयुक्त म्हणाले, अधूनमधून अशा प्रकारे दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी वेळेत पडतो. येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच देवाकडे प्रार्थनादेखील करावीच लागेल. पिकांची जोपासना केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करणे शक्य नसते. जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे फायदा होतो आहे. त्यावर आणखी दूरगामी काम करावे लागणार आहे. मराठवाडा विभागात कमी पाऊस पडला असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा शासनाने केली आहे. याप्रकरणी नियोजनासंबंधी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विभागाचे ७७९ मि. मी. इतके पर्जन्यमान आहे. १२१ मि. मी. इतका पाऊस महिनाभरात झाला आहे. ४उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. पाऊस लांबला तर देवाकडे धावा करण्याविना पर्याय नसल्याचे आयुक्त म्हणाले.