शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पावसासाठी देवाकडे धावा

By admin | Updated: July 7, 2015 00:56 IST

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. पावसासाठी देवाकडे प्रार्थना करणे आणि शेतकऱ्यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नसल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. उपलब्ध पाण्याचा वापर करून आहेत ती पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. विभागात ५० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झालेल्या आहेत. काही जिल्ह्यांत पेरण्या झाल्या आहेत, तर काही जिल्ह्यांत झाल्याच नाहीत. उडीद, मुगाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर तूर, बाजरी, सोयाबीनचे उत्पादन सरासरी गाठेल. पाऊस १५ ते ३० दिवस लांबला तर कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय नियोजनाचा आराखडा तयार आहे, असेही ते म्हणाले. निसर्गासमोर प्रशासकीय यंत्रणादेखील हतबल झाली असून, संकटांचा सामना करण्यासाठी जनमानसांचे धैर्य वाढविण्यासाठी विभागीय पातळीवर प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. आयुक्त म्हणाले, अधूनमधून अशा प्रकारे दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी वेळेत पडतो. येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच देवाकडे प्रार्थनादेखील करावीच लागेल. पिकांची जोपासना केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करणे शक्य नसते. जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे फायदा होतो आहे. त्यावर आणखी दूरगामी काम करावे लागणार आहे. मराठवाडा विभागात कमी पाऊस पडला असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा शासनाने केली आहे. याप्रकरणी नियोजनासंबंधी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विभागाचे ७७९ मि. मी. इतके पर्जन्यमान आहे. १२१ मि. मी. इतका पाऊस महिनाभरात झाला आहे. ४उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. पाऊस लांबला तर देवाकडे धावा करण्याविना पर्याय नसल्याचे आयुक्त म्हणाले.