शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

रवळा धरणातील पाण्यावर दरोडा

By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST

सोयगाव : तालुक्यातील रवळा धरणाच्या गेटच्या साखळ्या तोडून, गेट फिरवून मंगळवारी मध्यरात्री विनापरवाना पाणी सोडून देण्यात आले.

सोयगाव : तालुक्यातील रवळा धरणाच्या गेटच्या साखळ्या तोडून, गेट फिरवून मंगळवारी मध्यरात्री विनापरवाना पाणी सोडून देण्यात आले. जामठी, रवळा, जवळा व पिंपळा या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अत्यल्प साठा असताना हजारो लिटर पाणी वाहून गेले, त्यामुळे चार गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.दरवर्षी ऐन टंचाईच्या काळात पाणी सोडले जाते. जामनेर तालुक्यातील गोंद्री येथील काही शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणी सोडत असल्याचा आरोप चारही गावांतील ग्रामस्थ करीत आहेत.धरणात केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा शिल्लक असताना दि. १ जुलैच्या मध्यरात्री धरणाच्या गेटच्या साखळ्या दगडाने तोडण्यात आल्या व टिकासच्या साह्याने गेट फिरवून पाणी सोडून देण्यात आले. दि. २ रोजी ही बाब लक्षात आली, तोपर्यंत फत्तेपूर( ता. जामनेर)कडे जाणाऱ्या नदीत ५ ते ६ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले होते. आधीच पाणी कमी, त्यात हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने चार गावांतील जवळपास सात हजार लोकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. आपल्या हक्काचे पाणी शेतीला न वापरता पिण्यासाठी राखून ठेवणारे शेतकरी पाणी सोडल्यामुळे संतप्त झाले आहेत. सदरील प्रकरणाची माहिती तहसील प्रशासनास कळविण्यात आली असून तलाठी खैरनार व ग्रामसेवक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन वाहणारे पाणी गेट टाकून अडविले. पाटबंधारे विभागाचे मात्र अद्याप कुणीही फिरकलेले नाही. (वार्ताहर)परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दरवर्षी उपद्व्यापदरवर्षी अशा प्रकारे या धरणातून अवैधरित्या पाणी सोडून दिल्या जाते. परंतु लघु पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करते. तसेच तालुका प्रशासनाचाही या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा असतो. गेल्या वर्षीही असेच मे महिन्यात पाणी सोडून देण्यात आले होते. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. तरीही यंदा पुन्हा पाणी सोडल्या गेले. धरणात मोटारी टाकून पाणी उपसा करणाऱ्यांवर तहसील विभागाने जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे; परंतु धरणातून पाणी चोरल्यामुळे काय कारवाई होणार, हे जाणून जामनेर तालुक्यातील गोंद्री येथील काही शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार करतात, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.