शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

दुष्काळी निधीचे १९० कोटी परत

By admin | Updated: March 17, 2015 00:48 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. तांत्रिक कारणांमुळे निधी परत गेला असला तरी अर्थसंकल्पात तरतूद होऊन तो पुन्हा मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नासच्या खाली आलेली आहे. त्यामुळे शासनाने खरीप अनुदानापोटी शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज दिले आहे. विभागातील ४३ लाख शेतकऱ्यांना ही वैयक्तिक मदत मिळणार आहे. त्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारने यापैकी १६९० कोटी रुपयांचा निधी विभागास उपलब्ध करून दिला होता.७ मार्चपर्यंत त्यातील १५०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. शासनाने ही रक्कम आकस्मिकता निधीतून उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उरलेली रक्कम हिशेबासाठी शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार उरलेले १९० कोटी रुपये शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. आता अर्थसंकल्पात तरतूद होऊन ही रक्कम मराठवाड्याला पुन्हा दिली जाईल, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले. ४मराठवाड्यातील सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत.४आतापर्यंत २९ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित १४ लाख शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पाचशे ३२ कोटी रुपये निधी मिळणे आवश्यक आहे.