शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

४१७ कोटी ६७ लाखांचा निधी अखर्चित

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : राज्य सरकारने निधीची वेळोवेळी पूर्तता करूनही जिल्हा परिषदेचे स्थानिक कारभारी व प्रशासनातील सुंदोपसुंदीमुळे समाजकल्याण विभागाचा तब्बल १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये

औरंगाबाद : राज्य सरकारने निधीची वेळोवेळी पूर्तता करूनही जिल्हा परिषदेचे स्थानिक कारभारी व प्रशासनातील सुंदोपसुंदीमुळे समाजकल्याण विभागाचा तब्बल १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये निधी दोन वर्षांपासून पडून आहे. त्यात दलित वस्ती सुधार योजनेसह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यास तत्कालीन सभापती रामनाथ चोरमले यांना तब्बल दोन वर्षे लागली; परंतु ते सभापतीपदावरून पायउतार होताच ही यादीच गायब झाली आहे. विद्यमान समाजकल्याण सभापती शीला विजय चव्हाण यांनी सांगितले की, लाभार्थ्यांची यादी गायब आहे. त्यामुळे जि. प. सदस्याकडून काही नवीन शिफारशी घेतल्या जातील व काही नावे पंचायत समित्यांनी पाठविलेल्या प्रस्तावावरून घेतले जातील. जुन्या प्रस्तावातील अनेक नावे बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्यासाठी प्रयत्न करू.समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना निष्क्रिय सभापती व कुचकामी प्रशासनाच्या टोलवाटोलवीत ठप्प झाल्या आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचे काम तर मागील तीन वर्षांपासून ठप्प झालेले आहे. या विभागाची सन २०१२-१३ वर्षाची शिल्लक ६ कोटी ७२ लाख २४ हजार २७४ रुपये.४या वर्षीचे प्राप्त अनुदान७ कोटी ६३ लाख ५० हजार रुपये.४एकूण शिल्लक रक्कम- १४ कोटी ३५ लाख ७४ हजार २७४ रुपये.सभापती चव्हाण यांनी सांगितले की, दलित सुधार वस्तीच्या १४ कोटी ३५ लाख ७४ हजार २७४ निधी पैकी ७ कोटी रुपयांचे नियोजन झाले आहे. त्यातही अनेक ग्रामपंचायतींच्या कामांना मंजुरी देताना निकष पाळण्यात आलेले नाहीत. उर्वरित निधीचे नियोजन करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्या म्हणाल्या, शासनाने दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च केल्यास पुढच्या वर्षी त्या निधीच्या दीडपट निधीचे नियोजन करता येते. यानुसार दरवर्षी आपण निधी दीडपटीने अधिक मिळवू शकतो; परंतु येथे निधी शिल्लक राहिल्यामुळे जास्त निधीची मागणी करता येत नाही. दलित वस्ती सुधार योजनेचा सर्व निधी सरकारने या अगोदरच उपलब्ध करून दिला आहे, तर वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या खर्चाची तरतूद जिल्हा परिषदेने अर्थ संकल्पात केलेली आहे. निधी उपलब्ध असूनही समाजकल्याण विभागाच्या योजना दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. हा निधी खर्च होऊन दलित समाजाला त्याचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही सतत सूचना देत आहोत; परंतु दलित वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासह वैैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थी यादी मंजूर करण्याचा हक्क सभापतींचा आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना साहाय्य करावे, अशा सूचना मी त्यांना वेळोवेळी दिल्या. आता लवकरच या सर्व योजना मार्गी लावू. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.-दीपक चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद