शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

४१७ कोटी ६७ लाखांचा निधी अखर्चित

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : राज्य सरकारने निधीची वेळोवेळी पूर्तता करूनही जिल्हा परिषदेचे स्थानिक कारभारी व प्रशासनातील सुंदोपसुंदीमुळे समाजकल्याण विभागाचा तब्बल १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये

औरंगाबाद : राज्य सरकारने निधीची वेळोवेळी पूर्तता करूनही जिल्हा परिषदेचे स्थानिक कारभारी व प्रशासनातील सुंदोपसुंदीमुळे समाजकल्याण विभागाचा तब्बल १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये निधी दोन वर्षांपासून पडून आहे. त्यात दलित वस्ती सुधार योजनेसह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यास तत्कालीन सभापती रामनाथ चोरमले यांना तब्बल दोन वर्षे लागली; परंतु ते सभापतीपदावरून पायउतार होताच ही यादीच गायब झाली आहे. विद्यमान समाजकल्याण सभापती शीला विजय चव्हाण यांनी सांगितले की, लाभार्थ्यांची यादी गायब आहे. त्यामुळे जि. प. सदस्याकडून काही नवीन शिफारशी घेतल्या जातील व काही नावे पंचायत समित्यांनी पाठविलेल्या प्रस्तावावरून घेतले जातील. जुन्या प्रस्तावातील अनेक नावे बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्यासाठी प्रयत्न करू.समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना निष्क्रिय सभापती व कुचकामी प्रशासनाच्या टोलवाटोलवीत ठप्प झाल्या आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचे काम तर मागील तीन वर्षांपासून ठप्प झालेले आहे. या विभागाची सन २०१२-१३ वर्षाची शिल्लक ६ कोटी ७२ लाख २४ हजार २७४ रुपये.४या वर्षीचे प्राप्त अनुदान७ कोटी ६३ लाख ५० हजार रुपये.४एकूण शिल्लक रक्कम- १४ कोटी ३५ लाख ७४ हजार २७४ रुपये.सभापती चव्हाण यांनी सांगितले की, दलित सुधार वस्तीच्या १४ कोटी ३५ लाख ७४ हजार २७४ निधी पैकी ७ कोटी रुपयांचे नियोजन झाले आहे. त्यातही अनेक ग्रामपंचायतींच्या कामांना मंजुरी देताना निकष पाळण्यात आलेले नाहीत. उर्वरित निधीचे नियोजन करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्या म्हणाल्या, शासनाने दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च केल्यास पुढच्या वर्षी त्या निधीच्या दीडपट निधीचे नियोजन करता येते. यानुसार दरवर्षी आपण निधी दीडपटीने अधिक मिळवू शकतो; परंतु येथे निधी शिल्लक राहिल्यामुळे जास्त निधीची मागणी करता येत नाही. दलित वस्ती सुधार योजनेचा सर्व निधी सरकारने या अगोदरच उपलब्ध करून दिला आहे, तर वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या खर्चाची तरतूद जिल्हा परिषदेने अर्थ संकल्पात केलेली आहे. निधी उपलब्ध असूनही समाजकल्याण विभागाच्या योजना दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. हा निधी खर्च होऊन दलित समाजाला त्याचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही सतत सूचना देत आहोत; परंतु दलित वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासह वैैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थी यादी मंजूर करण्याचा हक्क सभापतींचा आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना साहाय्य करावे, अशा सूचना मी त्यांना वेळोवेळी दिल्या. आता लवकरच या सर्व योजना मार्गी लावू. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.-दीपक चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद