शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मुंबईतील दानशूरांची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना २८ लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:17 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची अट संस्थेची होती

ठळक मुद्देविद्यापीठातील ८२२ विद्यार्थ्यांना मिळणार आधार बँक खात्यात चार महिने जमा होणार प्रत्येकी ११०० रुपये

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्ती, संस्था सरसावल्या असून पहिल्या महिन्याचा निधी ९ लाख ४ हजार २०० रुपये मंगळवारी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.

या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त ८२२ विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्यासाठी प्रति महिना ११०० रुपये दिले जाणार आहेत. यात ४७२ मुलांचा आणि ३५० मुलींचा समावेश आहे.   विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी डॉ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींची भेट घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी जमा करण्याची जिम्मेदारी देण्यात आली होती. यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी कुलगुरू फंडातून १० लाख रुपये दिले होते. त्यानंतर डॉ. काळे यांनी विविध संस्था, व्यक्तींची भेट घेऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न केले.

मुंबईतील ‘केअरिंग फें्रड्स’ या संस्थेचे निमेषभाई सुमती यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणार असाल, तर २२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. यानुसार डॉ. काळे यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून जेवणाऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी घेतली. तसे पत्रही ‘केअरिंग फें्रड्स’ संस्थेला देण्यात आले. त्यानंतर संस्थेने तात्काळ १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केला. उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा अहवाल दिल्यानंतर संस्था देणार आहे.शिवाय मुंबईतील तीन दानशूरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ६ लाखांचा निधी दिला आहे.  उस्मानाबाद उपकेंद्रातील ५० विद्यार्थ्यांनाही   मदत केली जाणार असल्याचे काळे यांनी  सांगितले.

४० लाख रुपये खर्च येणारचार महिने विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे देण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे. त्यापैकी १० लाख रुपये कुलगुरूंनी विद्यार्थी फंडातून दिले. उर्वरित पैशासाठी मुंबईतील दानशूरांनी २८ लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा झाला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत विविध सदस्यांनी पोटतिडकीने दुष्काळग्रस्त निधी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, नरहरी शिवपुरेवगळता कोणीही मदत दिली नाही. गोदावरी शाळेतील प्रा. बंडू सोमवंशी यांनीही ११ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ तत्पर मुंबईतील निमेषभाई सुमती, अंबाजोगाईतील अनिकेत लोहिया आदी दानशूर व्यक्तींचा लवकरच सत्कार केला जाईल. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जावे लागणार नाही. यासाठी विद्यापीठ तत्पर असेल.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू