शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुंबईतील दानशूरांची दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना २८ लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:17 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची अट संस्थेची होती

ठळक मुद्देविद्यापीठातील ८२२ विद्यार्थ्यांना मिळणार आधार बँक खात्यात चार महिने जमा होणार प्रत्येकी ११०० रुपये

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील दानशूर व्यक्ती, संस्था सरसावल्या असून पहिल्या महिन्याचा निधी ९ लाख ४ हजार २०० रुपये मंगळवारी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.

या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त ८२२ विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देण्यासाठी प्रति महिना ११०० रुपये दिले जाणार आहेत. यात ४७२ मुलांचा आणि ३५० मुलींचा समावेश आहे.   विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी डॉ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींची भेट घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी जमा करण्याची जिम्मेदारी देण्यात आली होती. यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी कुलगुरू फंडातून १० लाख रुपये दिले होते. त्यानंतर डॉ. काळे यांनी विविध संस्था, व्यक्तींची भेट घेऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न केले.

मुंबईतील ‘केअरिंग फें्रड्स’ या संस्थेचे निमेषभाई सुमती यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणार असाल, तर २२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. यानुसार डॉ. काळे यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून जेवणाऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी घेतली. तसे पत्रही ‘केअरिंग फें्रड्स’ संस्थेला देण्यात आले. त्यानंतर संस्थेने तात्काळ १० लाख रुपयांचा पहिला हफ्ता विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केला. उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा अहवाल दिल्यानंतर संस्था देणार आहे.शिवाय मुंबईतील तीन दानशूरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ६ लाखांचा निधी दिला आहे.  उस्मानाबाद उपकेंद्रातील ५० विद्यार्थ्यांनाही   मदत केली जाणार असल्याचे काळे यांनी  सांगितले.

४० लाख रुपये खर्च येणारचार महिने विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे देण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे. त्यापैकी १० लाख रुपये कुलगुरूंनी विद्यार्थी फंडातून दिले. उर्वरित पैशासाठी मुंबईतील दानशूरांनी २८ लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा झाला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत विविध सदस्यांनी पोटतिडकीने दुष्काळग्रस्त निधी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, नरहरी शिवपुरेवगळता कोणीही मदत दिली नाही. गोदावरी शाळेतील प्रा. बंडू सोमवंशी यांनीही ११ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला असल्याचे प्रशासनाने सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ तत्पर मुंबईतील निमेषभाई सुमती, अंबाजोगाईतील अनिकेत लोहिया आदी दानशूर व्यक्तींचा लवकरच सत्कार केला जाईल. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून जावे लागणार नाही. यासाठी विद्यापीठ तत्पर असेल.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू