शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Aurangabad Violence : दंगलीत १० कोटी २१ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:14 IST

शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला.

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला. दंगलीतील नुकसानीचा अंदाज नागरिकांच्या बयानातून (जबाब) बांधण्यात आला आहे. त्या दंगलीत ६४ वाहने, ७५ घरे व दुकानांचे नुकसान झाले असून, १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केलेल्या संयुुक्त पंचनाम्यात केली आहे. नागरिकांनी दिलेल्या बयान, माहितीनुसार हे पंचनामे करण्यात आले आहेत.

अप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड, सतीश सोनी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना मंगळवारी सायंकाळी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल सादर केला. राजाबाजार, नवाबपुरा, मोतीकारंजा, गुलमंडी, शहागंज येथे नुकसान झालेल्या पंचनाम्याची मूळ व बयानांची प्रत अहवालासोबत दिली आहे. दंगलीत झालेल्या नुकसानीत ६४ वाहने जळाली आहेत. वाहनधारकांनी दिलेल्या माहितीवरून हा आकडा समोर आला आहे. १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे ते नुकसान आहे. तसेच ७५ घरेव दुकानधारकांच्या जबाबानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये इतकी आहे. एकूण १३९ नागरिकांचे नुकसान झाले असून, त्याबाबत घेतलेल्या जबाबानुसार १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे ते नुकसान आहे.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद