शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Aurangabad Violence : दंगलीत १० कोटी २१ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:14 IST

शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला.

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला. दंगलीतील नुकसानीचा अंदाज नागरिकांच्या बयानातून (जबाब) बांधण्यात आला आहे. त्या दंगलीत ६४ वाहने, ७५ घरे व दुकानांचे नुकसान झाले असून, १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केलेल्या संयुुक्त पंचनाम्यात केली आहे. नागरिकांनी दिलेल्या बयान, माहितीनुसार हे पंचनामे करण्यात आले आहेत.

अप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड, सतीश सोनी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना मंगळवारी सायंकाळी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल सादर केला. राजाबाजार, नवाबपुरा, मोतीकारंजा, गुलमंडी, शहागंज येथे नुकसान झालेल्या पंचनाम्याची मूळ व बयानांची प्रत अहवालासोबत दिली आहे. दंगलीत झालेल्या नुकसानीत ६४ वाहने जळाली आहेत. वाहनधारकांनी दिलेल्या माहितीवरून हा आकडा समोर आला आहे. १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे ते नुकसान आहे. तसेच ७५ घरेव दुकानधारकांच्या जबाबानुसार झालेल्या नुकसानीची रक्कम ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये इतकी आहे. एकूण १३९ नागरिकांचे नुकसान झाले असून, त्याबाबत घेतलेल्या जबाबानुसार १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे ते नुकसान आहे.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद