शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

रानडुकरांचा धिंगाणा

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.गावाजवळील नदीपात्राला चिकटून दाट झाडी आहे. जवळच मक्याचे शेत आहे. पिकांवर ताव मारून दाट झाडीत रानडुकरे आश्रय घेतात. सकाळी ११ वाजता शेतात जाणाऱ्या सहा तर सायंकाळी सहा वाजता शेतातून परतणाऱ्या तिघांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला. काहींचा चावा घेतला तर काहींना डोक्याने ठोस दिली. त्यामुळे कळपाच्या कचट्यात सापडलेले महिला-पुरूष रक्तबंबाळ झाले.यांचा जखमींत समावेशप्रवीण अशोक लोखंडे, महादेव सर्जेराव जगताप, अंकुश श्रीकृष्ण गोतावळे, श्रीकांत अंकुश जगताप, नारायण धोत्रे, गोविंद सुदाम नखाते यांच्यावर सकाळी हल्ला झाला. यापैकी प्रवीण व महादेव यांच्यावर स्वारातीत तर इतरांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सायंकाळी रेणुका नारायण धोत्रे, भाग्यश्री अंकुश जगताप, सुशीला सिरसट या जखमी झाल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. शिंदे म्हणाले, रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल. (वार्ताहर)आवरगावचे उपसरपंच अमोल जगताप यांनी वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच रानडुकरांचा धुमाकूळ वाढल्याचा आरोप केला.४रात्री उशिरापर्यंत अधिकारी गावात पोहचले नव्हते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली आहे.