शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षतेची पाळमुळ छत्रपतींच्या राज्यकारभारात; विजय चोरमारे यांचे औरंगाबादमध्ये प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:04 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विजय चोरमारे यांचे ‘श्री छत्रपती शिवराय आणि समकालीन  संदर्भ’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान मंचावर उपस्थित होते. 

छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहेयावेळी विजय चोरमारे म्हणाले, सध्या भगव्या रंगाची भिती निर्माण झाली आहे. शिवकाळात भगवा म्हणजे विश्वासाचे प्रतिक होता. मात्र आता तिरंगा रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये धुडगूस घातला जात आहे. छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही चोरमारे यांनी केले. 

अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. यात त्यांनी भुदल, नौदलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय संचालक डॉ. राम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. शिवजयंती महोत्सवात आयोजित  स्पर्धातील विजेत्यांच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

ढोल, ताशा अन् लेझीम पथकांचे देखावेविद्यापीठात प्रवेशद्वार ते नाट्यगृहापर्यंत शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी भगवे फेट्यासह विशेष पेहराव परिधान केला होता. विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या नेसून मिरवणूकीत देखावे सादर केले. ढोल, ताशा आणि लेझीम पथकांनी विविध कसरती सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनीही छत्रपतीची प्रतिमा असलेले टिशर्ट घालून कसरती सादर केल्या. सकाळी ९ वाजता निघालेली मिरवणूक तब्बल तिन तासानंतर नाट्यगृहापर्यंत पोहचली. तत्पूर्वी या तैलचित्र मिरवणूकीची सुरूवात कुलसचिव डॉ. साधना पांडे,  डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या उपस्थितीत झाली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८