शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

धर्मनिरपेक्षतेची पाळमुळ छत्रपतींच्या राज्यकारभारात; विजय चोरमारे यांचे औरंगाबादमध्ये प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:04 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विजय चोरमारे यांचे ‘श्री छत्रपती शिवराय आणि समकालीन  संदर्भ’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान मंचावर उपस्थित होते. 

छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहेयावेळी विजय चोरमारे म्हणाले, सध्या भगव्या रंगाची भिती निर्माण झाली आहे. शिवकाळात भगवा म्हणजे विश्वासाचे प्रतिक होता. मात्र आता तिरंगा रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये धुडगूस घातला जात आहे. छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही चोरमारे यांनी केले. 

अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. यात त्यांनी भुदल, नौदलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय संचालक डॉ. राम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. शिवजयंती महोत्सवात आयोजित  स्पर्धातील विजेत्यांच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

ढोल, ताशा अन् लेझीम पथकांचे देखावेविद्यापीठात प्रवेशद्वार ते नाट्यगृहापर्यंत शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी भगवे फेट्यासह विशेष पेहराव परिधान केला होता. विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या नेसून मिरवणूकीत देखावे सादर केले. ढोल, ताशा आणि लेझीम पथकांनी विविध कसरती सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनीही छत्रपतीची प्रतिमा असलेले टिशर्ट घालून कसरती सादर केल्या. सकाळी ९ वाजता निघालेली मिरवणूक तब्बल तिन तासानंतर नाट्यगृहापर्यंत पोहचली. तत्पूर्वी या तैलचित्र मिरवणूकीची सुरूवात कुलसचिव डॉ. साधना पांडे,  डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या उपस्थितीत झाली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८