शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

तपासणी समितीची भूमिका गुलदस्त्यात !

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक

बाळासाहेब जाधव , लातूरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक उमेदवारांनाही चालकाची नोकरी लाटली आहे आहे. शिवाय, वेतन व वेतनेत्तर अनुदानाचा लाभही घेतला आहे. या प्रकरणी ‘लोकमत’मध्ये वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर एका चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी कागदपत्रांच्या तपासणी समितीची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाकडून २०१२ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ यातील ३० ते ३२ जणांची बोगस कागदपत्राअधारे भरती झाल्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समोर आली आहे़ यातील चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील लक्ष्मण डिगंबर बोरुडवाड याच्यावर बोगस कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळवून ३ वर्षे सेवा देऊन व पगारवाढ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परंतु, भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र तपासणीसाठी ३ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती़ या समितीने त्यावेळी कागदपत्रांची तपासणी केली होती का? केली असेल तर त्याचवेळी बोगस कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळविणारे उमेदवार उघडकीस का आले नाहीत, तसेच भरती प्रकिया पूर्ण झाल्यानंतर महिना, दोन महिने व सहा महिनपर्यंतही कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक होते. तरीही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणीची तसदी का घेतली नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ३२ जणांचे कागदपत्र बोगस आणि बोगसच आहेत. मात्र एकच मासा प्रशासनाच्या गळाला लागला आहे. अन्य उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीकडे कानाडोळाच आहे. शिक्षण मंडळाकडे शुल्क भरून कागदपत्रांच्या तपासणीची मागणी केली असली, तरी त्याचा पाठपुरावा अद्याप नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाकडूनही गुणपत्रिका व टीसीची पडताळणी अद्याप झाली नाही. ४ही तपासणी झाली, तर लक्ष्मण डिगंबर बोरुडवाडसारखे अनेकजण बनावटकार निदर्शनास येणार आहेत.लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत २०१२ मध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक अनंत मुंडीवाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लातूरच्या भरती घोटाळ्याबाबत वृत्तपत्रात वृत्त आल्याचे मी ऐकले आहे. परंतु, याबाबत कुठलाही लेखी अहवाल सुरक्षा व दक्षता विभागाकडून आलेला नाही़ बनावट कागदपत्रांचा अहवाल आल्यास कारवाई करू, असे ते म्हणाले.