शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तपासणी समितीची भूमिका गुलदस्त्यात !

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक

बाळासाहेब जाधव , लातूरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक उमेदवारांनाही चालकाची नोकरी लाटली आहे आहे. शिवाय, वेतन व वेतनेत्तर अनुदानाचा लाभही घेतला आहे. या प्रकरणी ‘लोकमत’मध्ये वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर एका चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी कागदपत्रांच्या तपासणी समितीची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाकडून २०१२ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे़ यातील ३० ते ३२ जणांची बोगस कागदपत्राअधारे भरती झाल्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समोर आली आहे़ यातील चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील लक्ष्मण डिगंबर बोरुडवाड याच्यावर बोगस कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळवून ३ वर्षे सेवा देऊन व पगारवाढ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परंतु, भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र तपासणीसाठी ३ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती़ या समितीने त्यावेळी कागदपत्रांची तपासणी केली होती का? केली असेल तर त्याचवेळी बोगस कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळविणारे उमेदवार उघडकीस का आले नाहीत, तसेच भरती प्रकिया पूर्ण झाल्यानंतर महिना, दोन महिने व सहा महिनपर्यंतही कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक होते. तरीही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणीची तसदी का घेतली नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ३२ जणांचे कागदपत्र बोगस आणि बोगसच आहेत. मात्र एकच मासा प्रशासनाच्या गळाला लागला आहे. अन्य उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीकडे कानाडोळाच आहे. शिक्षण मंडळाकडे शुल्क भरून कागदपत्रांच्या तपासणीची मागणी केली असली, तरी त्याचा पाठपुरावा अद्याप नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाकडूनही गुणपत्रिका व टीसीची पडताळणी अद्याप झाली नाही. ४ही तपासणी झाली, तर लक्ष्मण डिगंबर बोरुडवाडसारखे अनेकजण बनावटकार निदर्शनास येणार आहेत.लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत २०१२ मध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक अनंत मुंडीवाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लातूरच्या भरती घोटाळ्याबाबत वृत्तपत्रात वृत्त आल्याचे मी ऐकले आहे. परंतु, याबाबत कुठलाही लेखी अहवाल सुरक्षा व दक्षता विभागाकडून आलेला नाही़ बनावट कागदपत्रांचा अहवाल आल्यास कारवाई करू, असे ते म्हणाले.