शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’ कामांवर अवघे सव्वासात हजार मजूर !

By admin | Updated: April 1, 2016 01:03 IST

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. चारा तसेच पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तसेच ेमजुरांच्या हाताला काम मिळणेही कठीण झाले आहे.

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. चारा तसेच पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तसेच ेमजुरांच्या हाताला काम मिळणेही कठीण झाले आहे. असे असतानाही रोजगार हमी योजना फारशी गतीमान होताना दिसून येत नाही. आजही ६२१ ग्रामपंचायतींमध्ये मिळून अवघी ६०९ कामे सुरू आहेत. आणि या कामांवर केवळ ७ हजार २५२ मजूर कार्यरत आहेत. विशेष म्हणजेच शासन शेततळी तसेच पुनर्भरणाच्या कामांवर भर देत असताना येथे मात्र, दोन्ही मिळून अवघी ८५ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतीअंतर्गत रोहयोला गती येणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची उपासमार होवू नये या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीअंतर्गतही कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही या योजनेला अपेक्षित गती मिळत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर येते. मागील आठवड्यात ६२१ पैकी अवघ्या २१८ ग्रामपंचायतीअंतर्गत ६०९ कामे सुरू आहेत. या सर्व प्रकारच्या कामांवर मिळून केवळ ७ हजार २५२ मजूर काम करीत आहेत. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी स्थिती लक्षात घेवून या योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करण्यात आला. परंतु, आठ पैकी दोनच तालुक्यात तीही बोटावर मोजण्याइतपत कामे सुरू आहेत. सात कामांवर अवघे ७५ मजूर कार्यरत होते. अशीच काहीशी अवस्था जलस्त्रोत पुनर्भरणाची झाली आहे. ज्याच्यामुळे भूजल पातळी उंचाण्यास मदत होणार आहे, त्या उपाययोजनेकडेच दुर्लक्ष होतना दिसते. जिल्हाभरात मिळून ७८ कामे सुरू आहेत. यावर ६६२ मजूर कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शोष खड्डे घेण्याच्या बाबतीतही काही समाधानकारक चित्र नाही. एकमेव भूम तालुक्यात आठ कामे हाती घेण्यात आली आहेत. यावर ८ मजूर कार्यरत होते. लुज बोल्डर तसेच बांधाची कामेही या योजनेतून करता येतात. परंतु, सदरील कामेही अवघ्या दोनच तालुक्यात करण्यात येत आहेत. यात भूममध्ये १ तर परंडा येथे सहा अशी सात कामे सुरू आहेत. यावर २१५ मजूर कार्यरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या योजनेला गतीमान करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)