शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’ कामांवर अवघे सव्वासात हजार मजूर !

By admin | Updated: April 1, 2016 01:03 IST

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. चारा तसेच पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तसेच ेमजुरांच्या हाताला काम मिळणेही कठीण झाले आहे.

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. चारा तसेच पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तसेच ेमजुरांच्या हाताला काम मिळणेही कठीण झाले आहे. असे असतानाही रोजगार हमी योजना फारशी गतीमान होताना दिसून येत नाही. आजही ६२१ ग्रामपंचायतींमध्ये मिळून अवघी ६०९ कामे सुरू आहेत. आणि या कामांवर केवळ ७ हजार २५२ मजूर कार्यरत आहेत. विशेष म्हणजेच शासन शेततळी तसेच पुनर्भरणाच्या कामांवर भर देत असताना येथे मात्र, दोन्ही मिळून अवघी ८५ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतीअंतर्गत रोहयोला गती येणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची उपासमार होवू नये या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीअंतर्गतही कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही या योजनेला अपेक्षित गती मिळत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर येते. मागील आठवड्यात ६२१ पैकी अवघ्या २१८ ग्रामपंचायतीअंतर्गत ६०९ कामे सुरू आहेत. या सर्व प्रकारच्या कामांवर मिळून केवळ ७ हजार २५२ मजूर काम करीत आहेत. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी स्थिती लक्षात घेवून या योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करण्यात आला. परंतु, आठ पैकी दोनच तालुक्यात तीही बोटावर मोजण्याइतपत कामे सुरू आहेत. सात कामांवर अवघे ७५ मजूर कार्यरत होते. अशीच काहीशी अवस्था जलस्त्रोत पुनर्भरणाची झाली आहे. ज्याच्यामुळे भूजल पातळी उंचाण्यास मदत होणार आहे, त्या उपाययोजनेकडेच दुर्लक्ष होतना दिसते. जिल्हाभरात मिळून ७८ कामे सुरू आहेत. यावर ६६२ मजूर कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शोष खड्डे घेण्याच्या बाबतीतही काही समाधानकारक चित्र नाही. एकमेव भूम तालुक्यात आठ कामे हाती घेण्यात आली आहेत. यावर ८ मजूर कार्यरत होते. लुज बोल्डर तसेच बांधाची कामेही या योजनेतून करता येतात. परंतु, सदरील कामेही अवघ्या दोनच तालुक्यात करण्यात येत आहेत. यात भूममध्ये १ तर परंडा येथे सहा अशी सात कामे सुरू आहेत. यावर २१५ मजूर कार्यरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या योजनेला गतीमान करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)