शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे.

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे. परिणामी शेतकरी तसेच वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात महावितरणचे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत १०० व ६३ केव्हीए क्षमतेचे १५ हजार रोहित्र आहेत. रोहित्रांची संख्या मोठी असली तरी जळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे. चार तालुक्यांतील १०० व ६३ क्षमतेचे ७० पेक्षा अधिक रोहित्र जळाले आहेत. हे सर्व रोहित्र जालना येथील विविध एजन्सीकडे दुरूस्तीसाठी आहेत. मात्र, महावितरणच्या संथगतीच्या कारभारामुळे रोहित्र दुरूस्तीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी रोहित्र दुरूस्तीसाठी कन्हैयानगर येथील कार्यशाळेत खेटे घालत आहेत. दिवसाकाठी प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा रोहित्रांत बिघाड होत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. तर विभाग दोनमध्ये अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. या विभागातातील सिंगज तसेच थ्री फेजचे मिळून ४० रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तवित पाहता रोहित्र दुरूस्तीस दिल्यावर आठवडाभराच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांतील रोहित्र आठवड्यानंतरही मिळत नाही. पाच दुरूस्ती एजन्सी असूनही रोहित्र दुरूस्त होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)