शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे.

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे. परिणामी शेतकरी तसेच वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात महावितरणचे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत १०० व ६३ केव्हीए क्षमतेचे १५ हजार रोहित्र आहेत. रोहित्रांची संख्या मोठी असली तरी जळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे. चार तालुक्यांतील १०० व ६३ क्षमतेचे ७० पेक्षा अधिक रोहित्र जळाले आहेत. हे सर्व रोहित्र जालना येथील विविध एजन्सीकडे दुरूस्तीसाठी आहेत. मात्र, महावितरणच्या संथगतीच्या कारभारामुळे रोहित्र दुरूस्तीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी रोहित्र दुरूस्तीसाठी कन्हैयानगर येथील कार्यशाळेत खेटे घालत आहेत. दिवसाकाठी प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा रोहित्रांत बिघाड होत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. तर विभाग दोनमध्ये अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. या विभागातातील सिंगज तसेच थ्री फेजचे मिळून ४० रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तवित पाहता रोहित्र दुरूस्तीस दिल्यावर आठवडाभराच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांतील रोहित्र आठवड्यानंतरही मिळत नाही. पाच दुरूस्ती एजन्सी असूनही रोहित्र दुरूस्त होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)