शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे.

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे. परिणामी शेतकरी तसेच वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात महावितरणचे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत १०० व ६३ केव्हीए क्षमतेचे १५ हजार रोहित्र आहेत. रोहित्रांची संख्या मोठी असली तरी जळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे. चार तालुक्यांतील १०० व ६३ क्षमतेचे ७० पेक्षा अधिक रोहित्र जळाले आहेत. हे सर्व रोहित्र जालना येथील विविध एजन्सीकडे दुरूस्तीसाठी आहेत. मात्र, महावितरणच्या संथगतीच्या कारभारामुळे रोहित्र दुरूस्तीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी रोहित्र दुरूस्तीसाठी कन्हैयानगर येथील कार्यशाळेत खेटे घालत आहेत. दिवसाकाठी प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा रोहित्रांत बिघाड होत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. तर विभाग दोनमध्ये अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. या विभागातातील सिंगज तसेच थ्री फेजचे मिळून ४० रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तवित पाहता रोहित्र दुरूस्तीस दिल्यावर आठवडाभराच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांतील रोहित्र आठवड्यानंतरही मिळत नाही. पाच दुरूस्ती एजन्सी असूनही रोहित्र दुरूस्त होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)