शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आश्रमावरील दरोडा ; ९ संशयितांना अटक

By | Updated: November 28, 2020 04:11 IST

औरंगाबाद : चौका डोंगरामागील राधा गोविंद आश्रमात ११ नोव्हेंबरच्या रात्री महाराज आणि त्यांच्या साधकांना झालेली मारहाण दरोड्याच्या उद्देशाने ...

औरंगाबाद : चौका डोंगरामागील राधा गोविंद आश्रमात ११ नोव्हेंबरच्या रात्री महाराज आणि त्यांच्या साधकांना झालेली मारहाण दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ९ संशयित दरोडेखोरांना अटक केली असून, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन कार, चाकू आणि ७ मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

बाळू बापू चव्हाण, बलवान चैनसिंग पवार, भीमसिंग चेंजिंग पवार, कुलदीप डहाणसिंग ऊर्फ रुमालसिंग पारधी, राजेश ऊर्फ भालकर विठ्ठल सोळंकी, हेमराज करणसिंग सोलंकी, रामप्रसाद गणपत चव्हाण, कृष्णा ऊर्फ बाळू दहिवाळ आणि राधेश्याम ऊर्फ राजा रामराव भावले, अशी आरोपींची नावे आहेत. ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे त्यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी रात्री २.१५ वाजेच्या सुमारास आश्रमात अनोळखी दरोडेखोरांनी धुडगूस घालून तेथील शरणजित महाराज ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर (६१) यांना आणि त्यांच्या साधकांना बेदम मारहाण केली होती. यावेळी महाराजांनी जोरदार प्रतिकार केला, तसेच त्यांच्या साधकांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोर पसार झाले होते. या घटनेचा फुलंब्री पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होते. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी दोन कार वापरल्या होत्या. या कार चौका येथील देशी दारू दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. शिवाय आरोपींनी घटनास्थळावरून त्यांच्या साथीदाराला कॉल केला होता. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित रामप्रसाद चव्हाण आणि कृष्णा ऊर्फ बाळू दहिवाळ यांना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली देताना आरोपी राधेश्याम चिखलेचा मित्र करण सोळंकीने महाराजांकडे खूप पैसा असल्याची माहिती दिली. यानंतर करण याने तरोडा येथील त्याचे नातेवाईक आणि अन्य साथीदारांना घेऊन हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली.

पोलीस म्हणतात...

दरोडेखोरांवर ६१ वर्षीय महाराज पडले भारी

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ६१ वर्षे वयाच्या महाराजांवर अट्टल दरोडेखोरांनी हल्ला केला तेव्हा महाराज एकटेच आणि बेसावध होते. तयारीनिशी असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना बेसावध महाराज भारी ठरले. यामुळे दरोडेखोर घाबरून आश्रमातून एक रुपयाही न घेऊन जाता पळून गेले.