शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२२५ कोटींतून रस्ते; यादी दोन दिवसांत शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:03 IST

राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देमहापालिकेच्या सभेत झाला निर्णय : सर्व प्रभागातील रस्त्यांना प्राधान्य दिल्याचा दावा

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.जानेवारी महिन्यात शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी त्यांनी १२५ कोटी रुपये रस्त्यांसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार पदाधिकाºयांनी स्वत:च्या धोरणानुसार रस्त्यांची यादी तयार केली होती. प्रशासनाने पदाधिकाºयांच्या रस्त्यांच्या यादीला खो देऊन नवीन यादी तयार केली. त्या यादीचे पीपीटी सादरीकरण आज सभागृहात करण्यात आले. पीपीटीमध्ये काही रस्त्यांची नावे दोनदा आल्याचे सदस्यांनी सभागृहात सांगितले. १०० कोटींतून करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची यादी मध्ये असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. रस्त्यांच्या यादीत बदल करण्यासह २१२ कोटींची यादी २२५ कोटी रुपयांवर नेण्यात आली. त्यात पदाधिकाºयांनी सुचविलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यासह प्रस्ताव मंजूर करण्यात आला.पाणी प्रश्नावरून भाजपचा जेलभरो आंदोलनाचा इशारापाणी प्रश्नावरून भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी वॉर्डातील पाणी प्रश्न सुटला नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा देत सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. तर नगरसेवक नितीन चित्ते यांनी थेट लोटांगण घालून वॉर्डातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी महापौर, आयुक्तांकडे केली. यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. एमआयएम नगरसेवकांच्या निलंबनानंतर अडीच वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून शिवसेनेसह प्रशासनाची कोंडी केली. आयुक्त डॉ. निपुण विनायक, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना याप्रकरणी खुलासा करण्यास महापौरांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, ६७ एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक्स्प्रेस जलवाहिनी टाकली. त्यातून शून्य एमएलडी पाणीदेखील वाढले नाही. आयुक्त म्हणाले, समान पाणी वाटपाबद्दल प्रशासन काम करीत आहे. त्याचे आऊटपूट लवकरच मिळेल. माजी महापौर भगवान घडमोडे, सचिन खैरे, अंकिता विधाते, सत्यभामा शिंदे, सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप यांनी आपापल्या वॉर्डातील पाणी प्रश्न सभागृहात मांडला.-------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक