शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

रोडकरी फक्त घोषणाकरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:05 IST

मुंबई ते नागपूरपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असताना मुंबई ते कोलकाता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठून आणि कसा जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई ते नागपूरपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असताना मुंबई ते कोलकाता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठून आणि कसा जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबई ते कोलकाता मार्गासाठी नव्याने भूसपांदन करणार की समृद्धी मार्ग वगळून नागपूर ते कोलकाता असा तो मार्ग विकसित करणार याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. मात्र असे असले तरी त्या मार्गाची घोषणा करण्यात आल्यामुळे पुन्हा कोणते भूसंपादन करणार असा प्रश्न प्रशासन आणि शेतक-यांतून उपस्थित होत आहे. याबाबतीत राज्य सरकार आणि केंद्र यांचाही ताळमेळ नसल्याचे समोर येत आहे.गेल्या आठवड्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी १२ इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली; परंतु ते विद्यमान रस्त्यांना जोडणार की नव्याने तयार करणार याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ते १२ इकॉनॉमिक कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी अद्याप घोषणेपुरतीच असल्याचे दिसते आहे. नुसत्या घोषणांमुळे गडकरी हे निव्वळ ‘घोषणाकरी’ होत असल्याचे दिसते. राज्यात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रगतिपथावर आहे. मुंबई ते नागपूर असा ७२० कि़मी. पर्यंत तो मार्ग जाणार आहे. त्या मार्गाचा अंतिम आराखडा अद्याप समोर आलेला नाही. भूसंपादनानंतर मार्किंग आणि अलायमेंट ठरेल. त्यानंतर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. याच मार्गाला नागपूरपासून पुढे कोलकाताकडे नेण्यात येणार आहे की नाही नव्याने सगळे काही करायचे. याची स्पष्टता अद्याप नाही. जर तसे होत असेल तर मग ४२ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गाचा काहीअंशी खर्च केंद्र शासनाने उचलण्याची मागणी होत आहे. त्या मार्गासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारण्यात येत असून, एमएसआरडीसी लि. नावाने स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.