शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

रोडकरी फक्त घोषणाकरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:05 IST

मुंबई ते नागपूरपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असताना मुंबई ते कोलकाता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठून आणि कसा जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई ते नागपूरपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असताना मुंबई ते कोलकाता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठून आणि कसा जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबई ते कोलकाता मार्गासाठी नव्याने भूसपांदन करणार की समृद्धी मार्ग वगळून नागपूर ते कोलकाता असा तो मार्ग विकसित करणार याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. मात्र असे असले तरी त्या मार्गाची घोषणा करण्यात आल्यामुळे पुन्हा कोणते भूसंपादन करणार असा प्रश्न प्रशासन आणि शेतक-यांतून उपस्थित होत आहे. याबाबतीत राज्य सरकार आणि केंद्र यांचाही ताळमेळ नसल्याचे समोर येत आहे.गेल्या आठवड्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी १२ इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली; परंतु ते विद्यमान रस्त्यांना जोडणार की नव्याने तयार करणार याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ते १२ इकॉनॉमिक कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी अद्याप घोषणेपुरतीच असल्याचे दिसते आहे. नुसत्या घोषणांमुळे गडकरी हे निव्वळ ‘घोषणाकरी’ होत असल्याचे दिसते. राज्यात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रगतिपथावर आहे. मुंबई ते नागपूर असा ७२० कि़मी. पर्यंत तो मार्ग जाणार आहे. त्या मार्गाचा अंतिम आराखडा अद्याप समोर आलेला नाही. भूसंपादनानंतर मार्किंग आणि अलायमेंट ठरेल. त्यानंतर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. याच मार्गाला नागपूरपासून पुढे कोलकाताकडे नेण्यात येणार आहे की नाही नव्याने सगळे काही करायचे. याची स्पष्टता अद्याप नाही. जर तसे होत असेल तर मग ४२ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गाचा काहीअंशी खर्च केंद्र शासनाने उचलण्याची मागणी होत आहे. त्या मार्गासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारण्यात येत असून, एमएसआरडीसी लि. नावाने स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.