शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते आराखडा; मतभेदांना तोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:51 IST

भूमिगत गटार योजनेचे काम ३0 टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्ते विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. यात २0११ साली बनविण्यात आलेला आराखड्याचेच नवीन दरानुसार सादरीकरण करताना वस्तीच नसलेल्या भागातील रस्त्यांवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील मतभेद उघड झाले.

ठळक मुद्देगदारोळ : अनेक रस्त्यांना नावेच नसल्याने बोंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूमिगत गटार योजनेचे काम ३0 टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्ते विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. यात २0११ साली बनविण्यात आलेला आराखड्याचेच नवीन दरानुसार सादरीकरण करताना वस्तीच नसलेल्या भागातील रस्त्यांवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील मतभेद उघड झाले.न.प.च्या सभेनंतर नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक नेहालभैय्या, अनिता सूर्यतळ, गणेश बांगर, नाना नायक, माबूद बागवान, आरीफ लाला, अशोक नाईक, राम कदम, जावेद राज, उमेश गुट्टे, राजेश गोटे आदींची यावेळी उपस्थिती होती. हिंगोली शहरात अनेक नव्या वस्त्या अस्तित्वात येत आहेत. अशा वस्त्यांना जोडणारे मोठे रस्ते होणे स्वागतार्हच बाब आहे. काही वस्त्या पूर्ण तर काही अर्धवट वसल्या आहेत. अशा वस्त्यांचे १२, १५ व १८ मीटरचे रस्ते या आराखड्यात नाहीत. त्यांचाही यात समावेश होणे गरजेचे आहे. यावरून नगरसेवकांनी आवाज उठविला. तर भूमिगत गटार योजनेचे काम झाल्यानंतर शहरातील ६ व ९ मीटरच्या रस्त्यांचे बेहाल झाल्यास त्यांची कशी दुरुस्ती करायची, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यात ९ मीटरच्या रस्त्यांचा समावेश करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. तसे झाल्यास शहरातील बहुतांश रस्त्यांची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. शिवाय होणारे सर्वाधिक नुकसान हे याच रस्त्यांचे आहे. त्यामुळे नगरसेवकांनी केलेली मागणी रास्त आहे. शासनाकडे विशेष प्रस्ताव म्हणून ही मागणी करण्यास न.प.पदाधिकाºयांना जोर लावावा लागणार आहे. मात्र पदाधिकारी आहे त्या रस्त्यांवरुनच वादंग उभे करू लागल्याने पेच निर्माण झाला होता. जेथे नुसतीच प्लॉटिंग आहे, एकही घर नाही, तेथे रस्ता नको, अशी रास्त भूमिका नगराध्यक्ष बांगर यांनी मांडली. डेव्हलपर्ससाठी नव्हे, तर लोकांसाठी रस्ते बनले पाहिजेत, यावर ते ठाम होते. मात्र नंतर जे रस्ते डीपी प्लॅनमध्ये आहेत, अशांना या आराखड्यात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हे वादंग शांत झाले.