शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लातूरच्या पाण्याविरोधात रेणापूरकर ‘रस्त्यावर’

By admin | Updated: March 10, 2016 00:47 IST

रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अल्पस: पाणीसाठा आहे़ त्यामुळे या प्रकल्पातील पाणी लातूरला नेण्यात येऊ नये़ या मागणीसाठी बुधवारी सर्वपक्षीय

रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अल्पस: पाणीसाठा आहे़ त्यामुळे या प्रकल्पातील पाणी लातूरला नेण्यात येऊ नये़ या मागणीसाठी बुधवारी सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने रेणापूर पिंपळफाटा येथे तासभर रस्तारोको आंदोेलन करण्यात आले़ रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथे रेणा मध्यम प्रकल्प आहे़ या प्रकल्पातून रेणापूर, पानगाव, खरोळा या मोठया गावांसह ३५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा आहे़ त्यामुळे काही दिवसच ३५ गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो़ त्यानंतर मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अशा परिस्थितीत लातूर शहरासाठी जलवाहिनी व टँकरद्वारे रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा केला जात आहे़ प्रकल्पातील पाणी लातूरला पुरविण्यात येत आहे़ त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील गावांना टंचाईस सामोरे जावे लागणार आहे़ हा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा़ या मागणीसाठी ५ मार्च रोजी रेणापूर शहर बंद ठेवण्यात आले होते़ तरीही लातूरला पाणीपुरवठा होत असल्याने अखेर बुधवारी रेणापुरातील सर्व पक्ष व संघटनांच्यावतीने पिंपळफाटा येथे सकाळी ११ वाजता तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़ यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता़दरम्यान, या आंदोलनामुळे लातूर-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात रेणापूर, पानगाव, खरोळा, सेलू जवळगा, भंडारवाडी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. पाणी आमच्या हद्दीतले असून, आमचा त्यावर प्रथम अधिकार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.