शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्ता उंच, मालमत्ता खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी ...

औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी अनेक निवासस्थानांच्या आवारात साचते आहे. साईडड्रेन केल्या असल्या तरी त्यातून पुरेसे पाणी वाहून जात नसल्याचे मालमत्ताधारक सांगत आहेत.

खड्डा करतोय ट्रॅफिक जाम

औरंगाबाद : जालना रोडवरील हायकोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर अर्ध्या फुटापेक्षा खोलवर २० फुटँचा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यातून वाहने आदळत आहेत. सिग्नलपासून २०० मीटरच्या अंतरात असलेल्या या खड्ड्यामुळे प्रचंड वाहतूक खोळंबते आहे.

जयभवानीनगर रस्त्याचे काम ठप्प

औरंगाबाद : जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. एका बाजूचे काम अर्धवट झाले आहे; तर दुसऱ्या बाजूचे काम अद्याप सुरू होण्याची शक्यता नाही. त्यातच पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या रस्त्याचे काम तातडीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.

फुलांना आला भाव

औरंगाबाद : महालक्ष्मीचे (गौरी गणपती) रविवारी आगमन झाले. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फुलांना प्रचंड भाव आला होता. चमेलीची फुले १०० रुपयांत अडीचशे ग्राम विकली गेली; तर काही ठिकाणी झेंडूची फुले १०० रुपये किलो होती.

पुलाखाली पडले खड्डे

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल सिडको येथील पुलाखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहनचालकांना खड्ड्यांचे अडथळे पार करीत जावे लागते आहे.

स्मशानभूमीसमोरील गळती थांबेना

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोरच जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे रस्ता उखडत चालला असून तेथे मोठे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या पायथ्याशी हे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने जावे लागते.

सणासुदीत विजेचा लपंडाव

औरंगाबाद : सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे नागरिकांतून महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होतो आहे. पुंडलिकनगर, गजानननगर, हनुमाननगर, परिजातनगर, एन-४ या भागांत रविवारी वारंवार वीजपुरवठा खंडित झाला.

भजन संध्याचे आयोजन

औरंगाबाद : दाधीच ब्राह्मण समाजातर्फे १३ व १४ सप्टेंबर रोजी भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्रसेन भवन पानदरिबा येथे १३ रोजी सायंकाळी ७ वाजता भजनसंध्या, तर १४ रोजी सकाळी ११ ते ४ या दरम्यान महाआरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

दमडी महल पुलाजवळील काम सुरू

औरंगाबाद : दमडी महल पुलाजवळील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू केल्यामुळे पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक नागरी वसाहतींमधून जात असल्याने रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

सुरक्षा भिंतीचा मलबा तसाच

औरंगाबाद : गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची सुरक्षा भिंत खचली असून त्याचा मलबा अजून तसाच पडून आहे. त्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे भिंत लवकर बांधण्याची मागणी आहे.