शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता उंच, मालमत्ता खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी ...

औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी अनेक निवासस्थानांच्या आवारात साचते आहे. साईडड्रेन केल्या असल्या तरी त्यातून पुरेसे पाणी वाहून जात नसल्याचे मालमत्ताधारक सांगत आहेत.

खड्डा करतोय ट्रॅफिक जाम

औरंगाबाद : जालना रोडवरील हायकोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर अर्ध्या फुटापेक्षा खोलवर २० फुटँचा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यातून वाहने आदळत आहेत. सिग्नलपासून २०० मीटरच्या अंतरात असलेल्या या खड्ड्यामुळे प्रचंड वाहतूक खोळंबते आहे.

जयभवानीनगर रस्त्याचे काम ठप्प

औरंगाबाद : जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. एका बाजूचे काम अर्धवट झाले आहे; तर दुसऱ्या बाजूचे काम अद्याप सुरू होण्याची शक्यता नाही. त्यातच पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या रस्त्याचे काम तातडीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.

फुलांना आला भाव

औरंगाबाद : महालक्ष्मीचे (गौरी गणपती) रविवारी आगमन झाले. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फुलांना प्रचंड भाव आला होता. चमेलीची फुले १०० रुपयांत अडीचशे ग्राम विकली गेली; तर काही ठिकाणी झेंडूची फुले १०० रुपये किलो होती.

पुलाखाली पडले खड्डे

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल सिडको येथील पुलाखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहनचालकांना खड्ड्यांचे अडथळे पार करीत जावे लागते आहे.

स्मशानभूमीसमोरील गळती थांबेना

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोरच जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे रस्ता उखडत चालला असून तेथे मोठे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या पायथ्याशी हे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने जावे लागते.

सणासुदीत विजेचा लपंडाव

औरंगाबाद : सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे नागरिकांतून महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होतो आहे. पुंडलिकनगर, गजानननगर, हनुमाननगर, परिजातनगर, एन-४ या भागांत रविवारी वारंवार वीजपुरवठा खंडित झाला.

भजन संध्याचे आयोजन

औरंगाबाद : दाधीच ब्राह्मण समाजातर्फे १३ व १४ सप्टेंबर रोजी भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्रसेन भवन पानदरिबा येथे १३ रोजी सायंकाळी ७ वाजता भजनसंध्या, तर १४ रोजी सकाळी ११ ते ४ या दरम्यान महाआरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

दमडी महल पुलाजवळील काम सुरू

औरंगाबाद : दमडी महल पुलाजवळील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू केल्यामुळे पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक नागरी वसाहतींमधून जात असल्याने रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

सुरक्षा भिंतीचा मलबा तसाच

औरंगाबाद : गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची सुरक्षा भिंत खचली असून त्याचा मलबा अजून तसाच पडून आहे. त्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे भिंत लवकर बांधण्याची मागणी आहे.