शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बांधकाम साहित्यांनी रस्ते अडले

By admin | Updated: January 24, 2017 22:36 IST

लातूर :शहरात आता मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत असून अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी वाळू, खडी, सळई, विटा आदींचे ढिग बांधकामधारकांनी टाकले आहेत.

लातूर : मागील उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे बांधकामांना स्थगिती होती. मात्र शहरात आता मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत असून अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी वाळू, खडी, सळई, विटा आदींचे ढिग बांधकामधारकांनी टाकले आहेत. रस्तेच अडल्याने रहदारीला अडथळा होत आहे. शहरातील प्रकाशनगर, बोधेनगर, कोकाटेनगर, विकासनगर, देशी केंद्र शाळा परिसर, राजस्थान शाळेच्या पाठीमागील भाग, विवेकानंद रुग्णालय परिसर, मंत्रीनगर परिसर, विकासनगर, आवंतीनगर, औसा रोडवरील कालिकादेवी मंदिर परिसर, पद्मानगर, विक्रमनगर, विशालनगर, शिवनगर परिसर, सीतारामनगर, कपिलनगर, वैभवनगर आदी भागांत मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम सुरू आहे. बांधकामधारकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच ढिग करून लावले आहेत. त्यामुळे या परिसरातील बहुतांश रस्ते अडविल्याचे दिसत आहे. या अंतर्गत रस्त्यांवरून चारचाकी तर सोडा, दुचाकीवरून जाणेही शक्य नाही. बांधकामधारकांनी आपले साहित्य ठेवण्यासाठी रस्त्याचा कोपरा किंवा स्वतंत्र जागा उपलब्ध न करता रस्त्यांवर टाकल्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. कुठे १५ ते २० फुटांचे तर कुठे १० फुटांचेच अंतर्गत रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर वाळू, खडी, विटा, सळई ठेवल्यामुळे काही ठिकाणी तर रस्ते पूर्णत: बंद झाले आहेत. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बांधकाम परवाने देताना मनपा प्रशासनाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी काय सोय केली, या बाबी तपासणे आवश्यक आहे. मात्र मनपाकडून परवाना देताना या बाबींची तपासणी होत नाही. लातूर शहरातील गावभागात तसेच पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. बांधकामधारकांनी आपले बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकल्यामुळे अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा होत आहे. काही रस्त्यांवर तर वाहने गेल्यास काढण्यासाठी कसरत करावी लागते.