शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

इसिसचा धोका संपूर्ण जगाला

By admin | Updated: February 17, 2016 00:47 IST

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही;

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही; परंतु या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आपला तरुण आपल्या ताब्यात कसा राहील, हे पाहिले पाहिजे. तो देशात राहण्यातच आपली प्रगती आहे, हे वाटायला लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित रविवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाचा आणि मंगळवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राचा आढावा घेतला. शहर पोलीस व मराठवाड्यातील दोन्ही परिक्षेत्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.इसिसबाबत विचारलेल्या प्रश्नावर महासंचालकांनी सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बोलण्यास सांगितले. आयुक्तांनी शहरातील तरुणांमध्ये जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत २७० शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांना राज्याबाबत विचारले असता पोलिसांनी भिवंडी, मालेगाव, उस्मानाबाद, कोकण आणि औरंगाबाद इ. ठिकाणांसह राज्यात तरुणांची मने वळविण्यासाठी जनजागृती सुरू केल्याचे सांगितले. १०० नक्षलवादी पकडलेनक्षलवादाबाबत दीक्षित म्हणाले की, गडचिरोलीची सध्याची परिस्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. पोलीस, विशेष कृती दल यांचे वर्षभरातील काम अतिशय चांगले आहे. ५० नक्षली ठार झाले आहेत. शंभरहून जास्त नक्षली पकडण्यात आले आहेत.