शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचा धोका संपूर्ण जगाला

By admin | Updated: February 17, 2016 00:47 IST

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही;

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही; परंतु या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आपला तरुण आपल्या ताब्यात कसा राहील, हे पाहिले पाहिजे. तो देशात राहण्यातच आपली प्रगती आहे, हे वाटायला लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित रविवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाचा आणि मंगळवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राचा आढावा घेतला. शहर पोलीस व मराठवाड्यातील दोन्ही परिक्षेत्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.इसिसबाबत विचारलेल्या प्रश्नावर महासंचालकांनी सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बोलण्यास सांगितले. आयुक्तांनी शहरातील तरुणांमध्ये जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत २७० शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांना राज्याबाबत विचारले असता पोलिसांनी भिवंडी, मालेगाव, उस्मानाबाद, कोकण आणि औरंगाबाद इ. ठिकाणांसह राज्यात तरुणांची मने वळविण्यासाठी जनजागृती सुरू केल्याचे सांगितले. १०० नक्षलवादी पकडलेनक्षलवादाबाबत दीक्षित म्हणाले की, गडचिरोलीची सध्याची परिस्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. पोलीस, विशेष कृती दल यांचे वर्षभरातील काम अतिशय चांगले आहे. ५० नक्षली ठार झाले आहेत. शंभरहून जास्त नक्षली पकडण्यात आले आहेत.