शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

वाढत्या उन्हासोबत सिल्लोड तालुक्याची तहानही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:32 IST

तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईची दाहकता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच १४६ टँकरने ७८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईची दाहकता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच १४६ टँकरने ७८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील केळगाव व खेळणा पालोद वगळता इतर सर्वच मध्यम लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मार्चअखेर टँकरचा आकडा २०० वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर व नेवपूर तसेच भोकरदन तालुक्यातील जुही धरणातून सिल्लोड तालुक्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे.१३१ पैकी ७८ गावे टँकरवरतालुक्यात एकूण १३१ गावे असून यापैकी तब्बल ७८ गावे टँकरवर अवलंबून आहेत. सारोळा व गोळेगाव बु. या दोन्ही गावांसाठी टँकरची मागणी केलेली आहे. परंतु वरील दोन्ही गावांचे प्रस्तावाचे प्रपत्र ब अप्राप्त आहे. यात दररोज कुठल्या ना कुठल्या गावांकडून टँकरची मागणी येत असल्याने अजून टँकरमध्ये वाढ होईल, असे चित्र दिसत आहे. टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.वरील या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम व भोकरदन तालुक्यातील जुही प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, घाटनांद्रा, धारला व बोरगाव बाजार या ७ गावांसाठी टँकरशिवाय ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.पालोद खेळणा मध्यम प्रकल्प शेवटची घटका मोजत असून केळगाव लघु प्रकल्पाची पाणीपातळीही खालावत आहे. तालुक्यातील इतर सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक