शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वाढत्या उन्हासोबत सिल्लोड तालुक्याची तहानही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:32 IST

तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईची दाहकता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच १४६ टँकरने ७८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईची दाहकता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच १४६ टँकरने ७८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील केळगाव व खेळणा पालोद वगळता इतर सर्वच मध्यम लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मार्चअखेर टँकरचा आकडा २०० वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर व नेवपूर तसेच भोकरदन तालुक्यातील जुही धरणातून सिल्लोड तालुक्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे.१३१ पैकी ७८ गावे टँकरवरतालुक्यात एकूण १३१ गावे असून यापैकी तब्बल ७८ गावे टँकरवर अवलंबून आहेत. सारोळा व गोळेगाव बु. या दोन्ही गावांसाठी टँकरची मागणी केलेली आहे. परंतु वरील दोन्ही गावांचे प्रस्तावाचे प्रपत्र ब अप्राप्त आहे. यात दररोज कुठल्या ना कुठल्या गावांकडून टँकरची मागणी येत असल्याने अजून टँकरमध्ये वाढ होईल, असे चित्र दिसत आहे. टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.वरील या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम व भोकरदन तालुक्यातील जुही प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, घाटनांद्रा, धारला व बोरगाव बाजार या ७ गावांसाठी टँकरशिवाय ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.पालोद खेळणा मध्यम प्रकल्प शेवटची घटका मोजत असून केळगाव लघु प्रकल्पाची पाणीपातळीही खालावत आहे. तालुक्यातील इतर सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक