शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

निर्यात वाढल्याने साखरेला चढला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जगातील नंबर वन साखर उत्पादक देश ब्राझिलमध्ये साखर उत्पादनावर मोठा परिणाम झाला अहे. यामुळे भारताच्या साखरेला ...

औरंगाबाद : जगातील नंबर वन साखर उत्पादक देश ब्राझिलमध्ये साखर उत्पादनावर मोठा परिणाम झाला अहे. यामुळे भारताच्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी वाढली आहे. त्यात सरकारने पुढील महिन्याचा साखर कोटा अपेक्षेपेक्षा कमी दिल्याने स्थानिक बाजारात साखरेला भाव चढला आहे. किरकोळ विक्रीत ३ रुपयांनी साखर महागली. आता सणासुदीत ग्राहकांना किलोभर साखरेसाठी ४० रुपये मोजावे लागत आहे.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच भारतीय व्यापाऱ्यांनी आपल्या शिपमेंटच्या पाच महिने आधी साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ब्राझिलमध्ये आधी उन्हाचा तडाखा व आता थंडीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. आणि जगाचे लक्ष देशात साखर उत्पादनात नंबर २वर असलेल्या भारताकडे वळाले आहे. येत्या डिसेंबर आणि जानेवारीत शिपमेंटसाठी पाच लाख टन कच्ची साखरेचे करार करणे सुरू केले आहे. भारतीय व्यापारी नेहमी डिसेंबरच्या एक महिना आधी हे निर्यातीचे करार करीत असत. याचा फायदा येथील साखर कारखान्यांना होत आहे. सप्टेंबरपर्यंत ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात होईल, असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात देशात साखर विक्रीचा कोटा २१ लाख मेट्रिक टन ठेवला होता. आता सप्टेंबर महिन्यासाठी २२ लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर झाला आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, अपेक्षेपेक्षा कोटा दोन लाख मेट्रिक टनने कमी दिल्याने त्याचा परिणाम साखरेच्या भाववाढीवर झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी किरकोळ विक्रीत ३७ रुपये किलोने विक्री होणारी साखर सध्या ४० रुपयांनी खरेदी करावी लागत आहे, पुढील महिन्यात आणखी किलोमागे १ रुपया वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.