शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

शहरात सिमेंट संस्कृतीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:58 AM

जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील ५० रस्ते गुळगुळीत करण्यात येणार आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्त्यांची कीर्ती राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचली होती. खड्ड्यांमुळे प्रचंड टीकेची झोड उठविण्यात येत होती. महापालिकेच्या कारभारावर प्रत्येक औरंगाबादकर मनातल्या मनात कुढत होते. औरंगाबादकरांचे हे दु:ख ‘लोकमत’ने ‘आता बस्स’या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मांडले. २३ सप्टेंबर २०१३ रोजी क्रांतीचौकात हजारोंच्या साक्षीने जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील५० रस्ते गुळगुळीत करण्यातयेणार आहेत.१९८८ पासून २०१० पर्यंत महापालिकेत डांबर लॉबीचा बोलबाला होता. दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात येत असत.या कामांचा दर्जा एवढा निकृष्ट असायचा की, एका वर्षात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळायचे. अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांची युती एवढी घट्ट होती की ती तोडणे अशक्यप्राय होते. मनपाच्या या कारभाराचा फटका शहराच्या गुंतवणुकीवर, पर्यटनावर होत होता. औरंगाबाद शहराची सर्वत्र नाचक्की होत असायची. खड्ड्यांचे शहर अशी प्रतिमा शहराची तयार होत होती. शहरातील १५ लाख नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ‘लोकमत’ने औरंगाबादकरांचे दु:ख लक्षात घेऊन खड्ड्यांच्या विरोधात ‘आता बस्स’या सदराखाली वृत्तमालिकाच प्रकाशित केली. या उपक्रमाला औरंगाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.त्यांच्या मनातील दु:खाला ‘लोकमत’ने वाट मोकळी करून दिली होती. ‘लोकमत’वृत्तपत्र समूह एवढ्यावरच न थांबता ऐतिहासिक क्रांतीचौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने जनआंदोलनही केले. त्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली. शहरात हळूहळू डांबरी रस्त्यांची कामे बंद करण्यात आली. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सिमेंट रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली. डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रस्त्यांवर खर्च जास्त असला तरी नागरिक, नगरसेवक सिमेंट रस्त्यांचीच आग्रही मागणी करू लागले. मागील चार वर्षांमध्ये मनपाने सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे ११४ वॉर्डांमध्ये केली. अजूनही १०० कोटींची छोटी-छोटी कामे प्रस्तावित आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे.