शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

टवाळखोरांनी केली दंगल, परिणाम बाजारपेठेवर; भीतीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 1, 2023 20:11 IST

सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले.

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपुरा भागात दगडफेक, जाळपोळीची अप्रिय घटना घडली. शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती जटवाडा रोडवरील ओहर या गावात झाली. याचा मोठा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला. गुरुवारची रामनवमी त्यात गुरुपुष्यामृत योग आणि रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार असे असतानाही मागील दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर रहदारी होती. पण, दुकानात ग्राहक तुरळक होते.

किराडपुऱ्यातील दंगलीनंतर लगातार दुसऱ्या दिवशी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळाले. सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने सध्या नवीन खरेदी टाळा, असा सल्ला घरातूनच महिलांना देण्यात आला होता. यंदा रामनवमी व गुरुपुष्यामृत असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित होती. पण, गुरुवारी पहाटे दंगलीची बातमी सर्वत्र पसरली आणि ग्राहकांनी बाजारात येणे टाळले. त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसला. आज रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार होता. सकाळपासून खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. पण, बाजारात नेहमीपेक्षा १० टक्केही उलाढाल झाली नाही. यामुळे लाखो, कोट्यवधीचा माल दुकानात भरून ठेवल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

२४ कोटीच्या उलाढालीवर पाणीटवाळखोर दंगल करतात. पण, त्याचा दूरगामी परिणाम बाजारपेठेवर होत असतो. मागील दोन दिवसात याची प्रचिती सर्वांना आली. दोन दिवसात २४ कोटीच्या उलाढालीवर पाणी फेरले. यातही मुहूर्ताच्या हिशोबाने कापड व्यापारी, सोने - चांदीच्या विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

फळांच्या विक्रीवर २० टक्के परिणामरमजान महिन्यात फळांची मोठी उलाढाल होते. दंगलीचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पण, फळांच्या विक्रीवर झाला नाही. कारण, फळांची विक्री तेवढीच आहे. मात्र, गुरुवारी रामनवमीनिमित्त खरबूज, रामफळ, अंगुर यांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम झाला.अश्फाक मोहमद, फळ विक्रेता.

व्यापाऱ्यांना भोगावा लागतो परिणामसध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. मात्र, दंगलीनंतर मागील दोन दिवसात धान्य बाजारातील ग्राहक गायब झाला आहे. दंगलीचा परिणाम व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. कारण, कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार