शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांनी केली दंगल, परिणाम बाजारपेठेवर; भीतीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 1, 2023 20:11 IST

सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले.

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपुरा भागात दगडफेक, जाळपोळीची अप्रिय घटना घडली. शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती जटवाडा रोडवरील ओहर या गावात झाली. याचा मोठा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला. गुरुवारची रामनवमी त्यात गुरुपुष्यामृत योग आणि रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार असे असतानाही मागील दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर रहदारी होती. पण, दुकानात ग्राहक तुरळक होते.

किराडपुऱ्यातील दंगलीनंतर लगातार दुसऱ्या दिवशी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळाले. सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने सध्या नवीन खरेदी टाळा, असा सल्ला घरातूनच महिलांना देण्यात आला होता. यंदा रामनवमी व गुरुपुष्यामृत असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित होती. पण, गुरुवारी पहाटे दंगलीची बातमी सर्वत्र पसरली आणि ग्राहकांनी बाजारात येणे टाळले. त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसला. आज रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार होता. सकाळपासून खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. पण, बाजारात नेहमीपेक्षा १० टक्केही उलाढाल झाली नाही. यामुळे लाखो, कोट्यवधीचा माल दुकानात भरून ठेवल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

२४ कोटीच्या उलाढालीवर पाणीटवाळखोर दंगल करतात. पण, त्याचा दूरगामी परिणाम बाजारपेठेवर होत असतो. मागील दोन दिवसात याची प्रचिती सर्वांना आली. दोन दिवसात २४ कोटीच्या उलाढालीवर पाणी फेरले. यातही मुहूर्ताच्या हिशोबाने कापड व्यापारी, सोने - चांदीच्या विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

फळांच्या विक्रीवर २० टक्के परिणामरमजान महिन्यात फळांची मोठी उलाढाल होते. दंगलीचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पण, फळांच्या विक्रीवर झाला नाही. कारण, फळांची विक्री तेवढीच आहे. मात्र, गुरुवारी रामनवमीनिमित्त खरबूज, रामफळ, अंगुर यांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम झाला.अश्फाक मोहमद, फळ विक्रेता.

व्यापाऱ्यांना भोगावा लागतो परिणामसध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. मात्र, दंगलीनंतर मागील दोन दिवसात धान्य बाजारातील ग्राहक गायब झाला आहे. दंगलीचा परिणाम व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. कारण, कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार