शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

टवाळखोरांनी केली दंगल, परिणाम बाजारपेठेवर; भीतीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 1, 2023 20:11 IST

सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले.

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपुरा भागात दगडफेक, जाळपोळीची अप्रिय घटना घडली. शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती जटवाडा रोडवरील ओहर या गावात झाली. याचा मोठा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला. गुरुवारची रामनवमी त्यात गुरुपुष्यामृत योग आणि रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार असे असतानाही मागील दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर रहदारी होती. पण, दुकानात ग्राहक तुरळक होते.

किराडपुऱ्यातील दंगलीनंतर लगातार दुसऱ्या दिवशी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळाले. सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने सध्या नवीन खरेदी टाळा, असा सल्ला घरातूनच महिलांना देण्यात आला होता. यंदा रामनवमी व गुरुपुष्यामृत असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित होती. पण, गुरुवारी पहाटे दंगलीची बातमी सर्वत्र पसरली आणि ग्राहकांनी बाजारात येणे टाळले. त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसला. आज रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार होता. सकाळपासून खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. पण, बाजारात नेहमीपेक्षा १० टक्केही उलाढाल झाली नाही. यामुळे लाखो, कोट्यवधीचा माल दुकानात भरून ठेवल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

२४ कोटीच्या उलाढालीवर पाणीटवाळखोर दंगल करतात. पण, त्याचा दूरगामी परिणाम बाजारपेठेवर होत असतो. मागील दोन दिवसात याची प्रचिती सर्वांना आली. दोन दिवसात २४ कोटीच्या उलाढालीवर पाणी फेरले. यातही मुहूर्ताच्या हिशोबाने कापड व्यापारी, सोने - चांदीच्या विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

फळांच्या विक्रीवर २० टक्के परिणामरमजान महिन्यात फळांची मोठी उलाढाल होते. दंगलीचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पण, फळांच्या विक्रीवर झाला नाही. कारण, फळांची विक्री तेवढीच आहे. मात्र, गुरुवारी रामनवमीनिमित्त खरबूज, रामफळ, अंगुर यांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम झाला.अश्फाक मोहमद, फळ विक्रेता.

व्यापाऱ्यांना भोगावा लागतो परिणामसध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. मात्र, दंगलीनंतर मागील दोन दिवसात धान्य बाजारातील ग्राहक गायब झाला आहे. दंगलीचा परिणाम व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. कारण, कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार