शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: October 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणी देण्याचे काम आजही आमच्याकडेच असल्याचा धक्कादायक खुलासा दिला आहे. कंपनी आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले आहे. शुक्रवारी ऐन दिवाळीत शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिका आणि युटिलिटी कंपनीत पाणीपुरवठ्याचा ताबा या मुद्यावर जोरदार न्यायालयीन लढाई सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला शुक्रवारी युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा महापालिकाच बघत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणीपुरवठा महापालिकेकडेच राहणार असल्याचा दावा विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पाणीपुरवठा आमच्याकडेचसर्वोच्च न्यायालयाकडूनही औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अविक बिस्वास यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम करणारे सर्व वेंडर आजही आमच्याकडे काम करीत आहेत. ते मनपात काम करण्यास तयार नाहीत. १३९ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाणीपुरवठा कंपनीच करीत आहे. ज्या भागात नळ नाहीत, तेथे आम्हीच टँकरने पाणी देत आहोत. जायकवाडी, फारोळ्यात आमचेच कर्मचारी केमिकलचा वापर करून पाणी देत आहेत. प्रयोगशाळेतही आमचेच कर्मचारी तैनात आहेत. तब्बल २०० कर्मचारी शहराचा पाणीपुरवठा सांभाळत आहेत. गुरुवारी जायकवाडी येथील वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला होता. थकबाकी भरल्याशिवाय वीज देणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली होती. मनपा आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने वीजपुरवठा सुरू केला. यामुळे सिडको-हडकोशिवाय जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी अनेक वसाहतींना पाणी देता आले नाही. शुक्रवारीही परिस्थितीत बदल झाला नव्हता. ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. शनिवारी सकाळी औरंगाबादकरांना अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. मनपाने पाणीच दिले नाही, तर अभ्यंगस्नान कसे करावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.