शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: October 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणी देण्याचे काम आजही आमच्याकडेच असल्याचा धक्कादायक खुलासा दिला आहे. कंपनी आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले आहे. शुक्रवारी ऐन दिवाळीत शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिका आणि युटिलिटी कंपनीत पाणीपुरवठ्याचा ताबा या मुद्यावर जोरदार न्यायालयीन लढाई सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला शुक्रवारी युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा महापालिकाच बघत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणीपुरवठा महापालिकेकडेच राहणार असल्याचा दावा विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पाणीपुरवठा आमच्याकडेचसर्वोच्च न्यायालयाकडूनही औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अविक बिस्वास यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम करणारे सर्व वेंडर आजही आमच्याकडे काम करीत आहेत. ते मनपात काम करण्यास तयार नाहीत. १३९ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाणीपुरवठा कंपनीच करीत आहे. ज्या भागात नळ नाहीत, तेथे आम्हीच टँकरने पाणी देत आहोत. जायकवाडी, फारोळ्यात आमचेच कर्मचारी केमिकलचा वापर करून पाणी देत आहेत. प्रयोगशाळेतही आमचेच कर्मचारी तैनात आहेत. तब्बल २०० कर्मचारी शहराचा पाणीपुरवठा सांभाळत आहेत. गुरुवारी जायकवाडी येथील वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला होता. थकबाकी भरल्याशिवाय वीज देणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली होती. मनपा आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने वीजपुरवठा सुरू केला. यामुळे सिडको-हडकोशिवाय जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी अनेक वसाहतींना पाणी देता आले नाही. शुक्रवारीही परिस्थितीत बदल झाला नव्हता. ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. शनिवारी सकाळी औरंगाबादकरांना अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. मनपाने पाणीच दिले नाही, तर अभ्यंगस्नान कसे करावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.