शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: October 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणी देण्याचे काम आजही आमच्याकडेच असल्याचा धक्कादायक खुलासा दिला आहे. कंपनी आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले आहे. शुक्रवारी ऐन दिवाळीत शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिका आणि युटिलिटी कंपनीत पाणीपुरवठ्याचा ताबा या मुद्यावर जोरदार न्यायालयीन लढाई सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला शुक्रवारी युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा महापालिकाच बघत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणीपुरवठा महापालिकेकडेच राहणार असल्याचा दावा विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पाणीपुरवठा आमच्याकडेचसर्वोच्च न्यायालयाकडूनही औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अविक बिस्वास यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम करणारे सर्व वेंडर आजही आमच्याकडे काम करीत आहेत. ते मनपात काम करण्यास तयार नाहीत. १३९ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाणीपुरवठा कंपनीच करीत आहे. ज्या भागात नळ नाहीत, तेथे आम्हीच टँकरने पाणी देत आहोत. जायकवाडी, फारोळ्यात आमचेच कर्मचारी केमिकलचा वापर करून पाणी देत आहेत. प्रयोगशाळेतही आमचेच कर्मचारी तैनात आहेत. तब्बल २०० कर्मचारी शहराचा पाणीपुरवठा सांभाळत आहेत. गुरुवारी जायकवाडी येथील वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला होता. थकबाकी भरल्याशिवाय वीज देणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली होती. मनपा आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने वीजपुरवठा सुरू केला. यामुळे सिडको-हडकोशिवाय जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी अनेक वसाहतींना पाणी देता आले नाही. शुक्रवारीही परिस्थितीत बदल झाला नव्हता. ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. शनिवारी सकाळी औरंगाबादकरांना अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. मनपाने पाणीच दिले नाही, तर अभ्यंगस्नान कसे करावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.